शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकर्यांना नवे बळ आणि नवा आत्मविश्वास

सिंधुदुर्ग – शासनाच्या विविध योजनांमुळे शेतकर्यांना नवे बळ आणि नवा आत्मविश्वास मिळत आहे. विशेषतः कृषी यांत्रिकीकरण योजनेमुळे शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळत आहे. यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा अधिक आत्मनिर्भर, सक्षम आणि समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. या अंतर्गतच जिल्ह्यातील ३३२ शेतकऱ्यांना सरकारकडून ७ कोटी २३ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य देण्यात आले आहे.
Sindhudurg Development Story: 332 Farmers Empowered with ₹7.23 Crore! 🌱
योजनेची वैशिष्ट्ये
१. कृषी यांत्रिकीकरण योजनेचा मुख्य उद्देश शेतकर्यांना कृषी यांत्रिकीकरणासाठी प्रोत्साहन देणे आणि दर्जेदार कृषी अवजारे अनुदानावर उपलब्ध करून देणे हा आहे. ट्रॅक्टर, पॉवर टिलर, रोपवाटिका यंत्र, फवारणी यंत्र, तसेच इतर आधुनिक साधनांच्या खरेदीसाठी शासनाकडून आर्थिक साहाय्य दिले जात आहे.
२. जिल्ह्यात या योजनेच्या अंतर्गत सुमारे ८ सहस्र लाभार्थ्यांना १७ कोटी रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे. त्यामुळे शेतीची उत्पादकता वाढण्यास साहाय्य झाल्याने शेतकरी अधिक सक्षम होत आहेत.
३. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा किंवा कृषी विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ https://krishi.maharashtra.gov.in/ याला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
दूध आणि दूधजन्य पदार्थांतील भेसळीविरुद्ध प्राधान्याने कारवाई करणार !
विसर्जित श्रीगणेशमूर्तींच्या ‘पीओपी’पासून बनवली जाणार बाकडी, विटा अन् शोभेच्या वस्तू !
कंटेनर वाहतुकीला चालना देण्यासाठी प्रयत्न : जुलैच्या पहिल्या आठवड्यात पहिली समर्पित कंटेनर रेल्वे चालू करणार !