सर्व कर्मफलांचा त्याग केल्याने शांती आणि मुक्ती मिळणे

प.पू. गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘अभ्यास, ज्ञान, ध्यान, कर्मफल त्याग आणि शांती ही उत्तरोत्तर अशी साधने आहेत. अभ्यासामुळे ज्ञान होते. ध्येयाचे ज्ञान प्राप्त झाल्यामुळे ध्यान करता येते. ध्यानमग्न मनुष्यापासून कर्मे दूर होतात. त्यामुळे त्यांच्या फळांचा सहजच त्याग होतो. कर्मफलांचा संबंध नाहिसा झाल्यामुळे मनुष्याला शांती मिळते. सर्व कर्मफलांचा, म्हणजे सर्व कामनांचा त्याग केल्यानंतर शांती मिळते आणि त्यानंतरच मुक्ती मिळते.’

– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

(मासिक ‘घनगर्जित’, जून २०१८)