
नाशिक – येथे गंगापूर रस्त्यावर मध्येच असलेली २ प्रचंड मोठी वडाची झाडे अनेक अपघात होत असल्याने पाडली पाहिजेत, असे एका गटाचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर ही झाडे तोडण्याचे काम चालू झाले आहे. या झाडांमुळे रस्त्यात अपघात होत असून त्या गावातील एकमेव आधुनिक वैद्य असलेल्या व्यक्तीचा येथे अपघातात मृत्यू झाला होता. पर्यावरणप्रेमींचा ही झाडे पाडण्यास विरोध आहे. त्यामुळे त्यांनी तिथे झाडाखाली बसून आंदोलन केले.
‘हरिद लवादा’मध्ये येथील झाडे पाडण्याच्या संदर्भात सुनावणी होणार होती; परंतु ६ एप्रिलला याविषयीची सुनावणी झाली नाही. ‘शतायू वृक्ष तोडतांना आपल्या मुलांचा विचार करा’, असे वाक्य लिहिलेले फलक पर्यावरणप्रेमींनी हातात घेतले होते. सर्वाेच्च न्यायालयाचा झाडे न तोडण्याचा आदेश असूनही ४०० ते ५०० वर्षे जुनी झाडे तोडली जात आहेत. अपघात झाडांमुळे होत नसून येथे ‘कृत्रिम अडथळे’ (बॅरिकेड्स) न उभारणार्या महापालिकेमुळे होत आहेत, असे पर्यावरणप्रेमींनी माध्यमांना सांगितले.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या