‘गुरुशिष्यांचे मंगल नाते प्रस्थापित झाल्यानंतर सद्गुरु हेच जणू आरसा होतात आणि त्या आरशात शिष्य स्वतःलाच पाहू लागतो. सद्गुरु रूप आरशाची किमया अशी की, साध्या आरशाप्रमाणे तो ‘जसे असेल, तसे दाखवत नाही’, तर ‘जसे असावे, तसे दाखवतो.’ एक प्रकारे ‘आदर्श शिष्य कसा असावा ?’, हे सद्गुरूंच्या ‘शब्द’ आणि ‘परा’ या दोन्ही अवस्थांतून शिष्याच्या हृदयावर प्रतिबिंबित होऊ लागते. स्वाभाविकपणे शिष्याला त्या अवस्थाप्राप्तीची तळमळ लागते. वेगाने वहाणार्या पाण्याला केवळ वाट करून द्यावी लागते. ज्या बळाने ती वाट आकारली जाते, त्यालाच ‘गुरुकृपा’ असे म्हणतात.’
– स्वामी विद्यानंद (साभार : ग्रंथ ‘चिंतनधारा’)

गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
प्रार्थना करण्यामागील गर्भितार्थ !
निःस्वार्थ प्रेम करा !