Mumbai : सिलिंडर चोरीला जाऊ नये म्हणून साखळदंडांनी बांधले !

जळगावमध्ये सिलिंडरचा साठा संपल्याने नागरिकांकडून आंदोलन !

लोकांनी सिलिंडर चोरीला जाऊ नयेत म्हणून साखळदंडांनी बांधून ठेवले !
(प्रतिकात्मक चित्र)

मुंबई – आखाती देशांत चालू असलेल्या युद्धाच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. मुंबईतील मालाडमधील मालवणी भागात सिलिंडरचा अत्यंत तुटवडा आहे. त्यामुळे गॅस एजन्सीबाहेर रांग लावल्यावर सिलिंडरची चोरी होऊ नये, यासाठी नागरिकांनी साखळदंडांनी ४-५ सिलिंडर एकत्र बांधून त्यांना कुलूप लावल्याची घटना समोर आली आहे.

लोकांनी गॅस सिलेंडरसाठी लावलेली रांग

नागपूर येथेही सिलिंडर पुरवठा विस्कळीत झाला आहे. एजन्सीबाहेर सिलिंडर उपलब्ध नसल्याचे फलक लावण्यात आले आहेत.

जळगाव येथेे समर्थ गॅस एजन्सीच्या कारभाराच्या विरोधात नागरिकांनी जामनेर-छत्रपती संभाजीनगर महामार्ग दीड घंटा रोखून धरला. एजन्सीकडून भ्रमणभाष आल्याने नागरिक पहाटेपासून रांगेत उभे राहिले; पण सकाळी ११ वाजता साठा संपल्याचे सांगण्यात आल्याने नागरिकांचा संयम सुटला. पोलीस आणि पुरवठा अधिकारी यांनी मध्यस्थी करून सर्वांना गॅस देण्याचे आश्‍वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले.

संपादकीय भूमिका

हेच आहे आपत्काळाचे भीषण वास्तव !