Iran Kashmiri Donations : काश्मीरमधील मुसलमानांकडून इराणला विविध प्रकारचे साहाय्य !

विधवा मुसलमान महिलेने दिले सोन्याचे दागिने

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – युद्धग्रस्त इराणला गेल्याच आठवड्यात भारताकडून  वैद्यकीय साहाय्य पाठवण्यात आले. आता काश्मीरमधून मुसलमानही इराणला साहाय्य करू लागले आहेत. (भारत सरकारने साहाय करणे आणि नागरिकांनी स्वतःच्या देशात राहून अन्य देशांसाठी अशा प्रकारचे साहाय्य देणे, या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत, हे समजून घ्यायला हवे ! – संपादक) त्यांनी रोख रक्कम, सोने आणि घरात उपयोगी पडणारे साहित्य साहाय्य म्हणून पाठवले आहेत. एका विधवा मुसलमान महिलेने सोन्याचे दागिने इराणला साहाय्य म्हणून देऊ केले आहेत. (किती मुसलमानांनी भारत-पाक आणि भारत-चीन यांच्या युद्धाच्या वेळी सरकारला असे साहाय्य केले होते ? भारतात भूकंप, पूर आदी नैसर्गिक संकटे येतात, तेव्हा किती मुसलमान साहाय्यासाठी धावतात ? – संपादक)

१. भारतातील इराणी दूतावासाने या महिलेचा व्हिडिओ ‘एक्स’वरून प्रसारित केला आहे. विशेष म्हणजे हा दगिना या विधवा महिलेला तिच्या पतीने दिला होता. त्यामुळे त्या दागिन्याशी तिचे अतिशय भावनिक नाते असल्याचे महिलेने सांगितले. २८ वर्षांपूर्वी  पतीचे निधन झाल्यापासून महिलेने हा दागिना जपून ठेवला होता. (भारतियांसाठी कधी हे दागिने अर्पण झाले असते का ? – संपादक) ‘तुमचे अश्रू आणि पवित्र भावना आम्हाला पाठबळ देणारे स्रोत आहेत’, अशा शब्दांत इराणी दूतावासाने त्या महिलेचे आणि भारतीय नागरिकांचे आभार मानले.

२. बडगाम येथे शिया मुसलमानांची संख्या अधिक असल्याने तेथून इराणसाठी साहाय्याचा ओघ वाढला आहे. अनेक ठिकाणी इराणला साहाय्य पाठवण्यासाठी स्टॉल उभारण्यात आले आहेत. (काश्मीरमधून परागंदा होण्यास भाग पाडलेले काश्मिरी हिंदु अनेक वर्षे तंबूमध्ये विस्थापितांचे जीवन जगत होते, तेव्हा या मुसलमानांनी कधी त्यांना अशा प्रकारचे साहाय्य केले नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक) नागरिक या ठिकाणी साहाय्य म्हणून रोख रक्कम, दागिने यांसह विविध वस्तू देत आहेत. महिला, पुरुष तसेच लहान मुलेही साहाय्य देण्यासाठी पुढे येत आहेत. लहान मुलांनी बचत केलेले पैसेही साहाय्य म्हणून दिले आहेत.

३. इराणी दूतावासाने साहाय्यासाठी बँक खात्यांचा तपशील सार्वजनिक केल्यानंतर अनेकांनी साहाय्य केले आहे. (या सर्वांची माहिती भारताने गोळा केली पाहिजे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • काश्मीरमध्ये ३५ वर्षांपूर्वी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंना हाकलून लावले. त्यांच्या संपत्तीवर अतिक्रमण केले आणि आताही ते हिंदूंना तेथे येण्यास विरोध करत आहेत; मात्र आता ते इराणला म्हणजे त्यांच्या धर्मबांधवांना साहाय्य करत आहेत ! यातून त्यांची निष्ठा कुणाप्रती आहे आणि आणि कुणाप्रती नाही, हे अधिक स्पष्ट झाले आहे ! असे मुसलमान कधीतरी भारताचे होऊ शकतील का ?
  • देशातील सर्व राज्यांपैकी सर्वाधिक पैसा काश्मीरच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून खर्च केला जातो आणि त्याच्या बदल्यात सर्वाधिक कर भरणार्‍या हिंदूंना काय मिळते ?