|
(‘एफ्.एस्.एस्.ए.आय.’ म्हणजे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया, म्हणजेच भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण)
जयपूर (राजस्थान) – येथे ‘एक्सपायरी डेट’ उलटून गेलेली अमूल आस्थापनाची तब्बल दीड लाख किलो खाद्य उत्पादने जप्त करून नष्ट करण्यात आली. एफ्.एस्.एस्.ए.आय. विभागाने कारवाई करून हा मोठा साठा नष्ट केला. एवढा माल नष्ट करण्यासाठी ४ दिवस लागले. एकूण २७ ट्रक भरेल एवढा हा माल होता. ही कारवाई जयपूरच्या खो नागोरियन परिसरातील एका गोदामावर धाड घालून करण्यात आली. तपासात मोठ्या प्रमाणात कालबाह्य खाद्यपदार्थ साठवून त्यावरील ‘एक्सपायरी डेट’ पुसून नवीन दिनांक छापून बाजारात विक्री करण्याची सिद्धता चालू असल्याची माहिती विभागाला मिळाली होती.
🚨 Jaipur (Rajasthan): 1.5 Lakh kg Expired Amul Products Destroyed
⚖️ The FSSAI carried out a 4-day disposal operation after uncovering a massive stock of expired Amul products.
❗ Shockingly, attempts were reportedly being made to sell these products by altering the expiry… pic.twitter.com/SGBw7bE1li
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 12, 2026
तपासाच्या वेळी अधिकार्यांना अनुमाने १२ सहस्र कार्टन (खोकी) कालबाह्य उत्पादने सापडली. यांपैकी अनुमाने ३ सहस्र ‘कार्टन’मधील पाकिटांवरील ‘एक्स्पायरी डेट’ पुसल्याचे आढळले. गोदामातून थिनर, ॲसिटोन आणि इतर रसायनेही जप्त करण्यात आली. ही रसायने पाकिटांवरील जुना दिनांक काढून टाकण्यासाठी वापरली जात असल्याचा संशय आहे.
संपादकीय भूमिका
|

बिदर (कर्नाटक) : महाहिंदु मेळाव्याला अनुमती मिळताच समाजकंटकांकडून श्रीरामाचा अवमान !
तुमच्याकडे वर्दी आहे; म्हणजे तुम्ही काहीही करू शकता का ? – Karnataka High Court
इस्लाम स्वीकारल्यास आपोआप ‘मागासवर्गीय मुसलमान’ दर्जा मिळू शकत नाही ! : Madras High Court
कोलकाता : ‘इस्कॉन’ने शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यान्ह भोजनातून अंडे हटवल्याने वाद !
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई