
चेन्नई (तमिळनाडू) – भारतीय नौदलाची सागरी शक्ती वाढण्यासाठी नौदलाने पाणबुडीविरोधी युद्धनौका ‘आय.एन्.एस्. अंजदीप’चा नौदलात समावेश केला. उथळ पाण्यात कार्य करण्याची क्षमता असलेल्या ८ पाणबुडीविरोधी युद्धनौकांच्या मालिकेतील या तिसर्या युद्धनौकेचा २७ फेब्रुवारीला येथे नौदलात समावेश झाला. ८० टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीने बनवलेली ही युद्धनौका ७७ मीटर लांबीची आहे. नौदलप्रमुख ॲडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी या समारंभाला उपस्थित होते. कोलकात्यातील ‘गार्डन रीच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स’ या स्वदेशी आस्थापनाने ही युद्धनौका सिद्ध केली आहे.
‘अंजदीप’ची वैशिष्ट्ये !
१. मुख्य कार्य : ही युद्धनौका ‘डॉल्फिन हंटर’ म्हणून काम करण्यासाठी बनवण्यात आली आहे. तिचा प्राथमिक उद्देश किनारी भागात, म्हणजेच उथळ पाण्यात असलेल्या शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेणे आणि त्यांचा पाठलाग करून त्या नष्ट करणे आहे, हा आहे.
२. ‘अंजदीप’ नाव का ? : कर्नाटकामधील कारवार किनार्यावर असलेल्या अंजदीप बेटावरून ‘अंजदीप’ हे नाव या युद्धनौकेला देण्यात आले आहे.
३. लाभ : ही यद्धनौका देशाच्या संरक्षण उत्पादन क्षमतांना बळकटी देईल आणि आयातीवरील अवलंबित्व अल्प करेल. अंजदीप हे नौदलाच्या त्याच नावाच्या जुन्या युद्धनौकेचे एक नवीन रूप आहे, जी वर्ष २००३ मध्ये निवृत्त झाली होती.
ही युद्धनौका जलद प्रतिसाद देतांना २५ नॉट्सचा वेग (४६.३ किमी प्रती घंटा वेग) गाठू शकते. ती विशेषतः समुद्री युद्ध वातावरणातील आव्हानांना तोंड देण्यासाठी बनवण्यात आली आहे. ही युद्धनौका नौदलातील आतापर्यंतचे सर्वांत मोठी ‘वॉटरजेट-प्रोपेल्ड युद्धनौका’ आहे. यामुळे समुद्रात खोलवर शत्रूचे धोके शोधून नष्ट करण्याची नौदलाची क्षमता वाढणार आहे. नौदलाच्या किनारी देखरेख आणि समुद्रात खाणकाम करण्याची क्षमतासुद्धा या युद्धनौकेमुळे वाढेल.
NCERT Introduces Emergency : ‘एन्.सी.इ.आर्.टी.’च्या इयत्ता ९ वीच्या पुस्तकात आणीबाणीची माहिती समाविष्ट
देवता, भारतमाता आणि राजकीय हुतात्मा यांच्या नावाने शपथ घेतली जाऊ शकत नाही ! – Kerala High Court
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्या ! – CM Devendra Fadnavis
Nasrapur Case : आरोपी भीमराव कांबळे दोषी; २९ जूनला सुनावणार अंतिम शिक्षा
नियमांचे उल्लंघन करणारे हॉटेल, रेस्टॉरंट आणि ढाबे यांच्या मालकांना सोडणार नाही ! – Tukaram Mundhe
‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री