
१. ‘२८.१०.२०२५ या दिवशी मी अहिल्यानगर (महाराष्ट्र) येथील सौ. सीमंतिनी बोर्डे (संगीत अलंकार) यांच्या स्वरात ध्वनीमुद्रित केलेली ‘भैरव’ रागाची पकड (टीप) ऐकली. ती ऐकल्यावर मला आनंद जाणवला.
टीप – रागाची पकड : रागाची अशी विशिष्ट स्वररचना किंवा स्वरांचा समूह, जो त्या रागाची ओळख लगेच करून देतो.

२. मी माझे डोळे बंद करून त्यांच्या स्वरातील पकड एकाग्रतेने ऐकत होतो. तेव्हा मला ‘पहाट आहे’, असे जाणवत होते. प्रत्यक्षात तेव्हा सायंकाळ होती ! सूर्यास्त झाला होता. त्यानंतर समजले की, राग भैरव हा पहाटे किंवा सकाळच्या प्रहरी गाण्याचा राग आहे.
३. मी ती पकड पुनःपुन्हा ऐकली. तेव्हा माझी मनःस्थिती चांगली झाली. मला मनःशांतीची अनुभूती आली.
४. ‘सौ. सीमंतिनी बोर्डे यांच्यावर श्री सरस्वतीदेवीची कृपा अखंड आहे’, असा विचार माझ्या मनात आला.
‘प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले), मला ही अनुभूती दिल्याबद्दल मी आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– श्री. गुरुप्रसाद बापट, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.१०.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या काही वेळा अनिष्ट शक्तींमुळे किंवा ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांना आलेल्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सर्वांनाच येतील, असे नाही. – संपादक |
हनुमान जयंतीच्या दिवशी चारचाकी गाडीने जात असतांना साधकाची दृष्टी आकाशाकडे गेल्यावर त्याला ढगांमध्ये झालेले मारुतिरायाचे दर्शन !
म्हार्दोळ (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई (वय ७८ वर्षे) यांचा साधनाप्रवास !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांना प्रश्न विचारणे आणि त्याचे उत्तर मिळेपर्यंत तो प्रश्न, तसेच पुढे ते उत्तरही काही घंट्यांत विसरून जाणे’, यांमागील कारणे
पत्नीच्या मेंदूच्या शस्त्रकर्माच्या वेळी साधकाने अनुभवलेली गुरुकृपा !
कर्करोगाच्या व्याधीला सामोरे जातांना साधिकेने अनुभवलेला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेचा वर्षाव !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती