
पिंपरी (पुणे) – श्रीक्षेत्र भंडारा डोंगर हा साधनेची, चिंतनाची आणि आध्यात्मिक अनुभूती देणारी जागा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी भक्तीचा मार्ग दाखवणारी, पंचमवेद असणार्या ‘तुकाराम गाथे’ची निर्मिती केली. ही भूमी येथे येणार्या आशीर्वाद देणारी आहे. श्रीक्षेत्र भंडारा डोेंगर हा वारकरी संप्रदायातील एक प्रेरणादायी शक्तीस्थळ म्हणून उदयास येईल, असा विश्वास ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’चे सहसरकार्यवाह श्री. अतुल लिमये यांनी व्यक्त केला. त्यांनी ‘श्रीक्षेत्र भंडारा डोंगरा’ला भेट देऊन तुकाराम महाराज यांच्या भव्य मंदिर निर्माण कार्याची पहाणी केली.
त्या वेळी लिमये यांचा ‘श्रीक्षेत्र भंडारा डोंगर ट्रस्ट’चे अध्यक्ष बाळासाहेब काशिद यांच्या हस्ते पगडी आणि वीणा देऊन सत्कार करण्यात आला.
श्री. अतुल लिमये पुढे म्हणाले की, अयोध्यानगरीत साकारण्यात आलेल्या प्रभु श्रीरामांच्या मंदिराचे शिल्पकारच तुकाराम महाराजांच्या मंदिर निर्माणाचे कार्य करत आहेत. संत तुकाराम महाराजांच्या भूमीत पाचवा वेद निर्माण झाला आहे. याच साधुसंतांच्या विचारांवर ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ गेली १०० वर्षे समाजाचे संघटन आणि राष्ट्र पुनरुत्थानाचे कार्य करत आहे.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !