
मिरज (जिल्हा सांगली), २५ जानेवारी (वार्ता.) –मिरज-पंढरपूर महामार्गावर नागज फाटा येथे १६ जानेवारीच्या रात्री २ वाजता बेळगावकडे शेतीमाल घेऊन जाणार्या श्री. अण्णासाहेब अडसूळ आणि श्री. भारत कापसे या २ शेतकर्यांना उपप्रादेशिक परिवहन विभागातील पोलीस असल्याचे सांगून एका बनावट पोलिसाने लुबाडले आहे. या शेतकर्यांच्या वाहनाचा पाठलाग करून एका ‘पोलीस’, असे लिहिलेल्या गाडीने त्यांना अडवून गाडीची कागदपत्रे दाखवल्यानंतरही ‘कांद्याची ५ पोती माझ्या गाडीमध्ये टाका; अन्यथा मी ही गाडी पोलीस ठाण्यात जमा करतो’, अशी धमकी त्या तोतया पोलिसाने दिली, तसेच या शेतकर्यांच्या वाहनातील ५ कांद्याची पोती स्वत: समवेत नेली. या संदर्भात लोकांची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस नागेश चव्हाण यांनी केली.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !