फलकावर ‘जय श्रीराम’ लिहिल्याने विद्यार्थ्याला मुसलमान शिक्षकाकडून मारहाण !

हिंदु शिक्षिकेने मुसलमान विद्यार्थ्याला शिस्त लावण्यासाठी हिंदु विद्यार्थ्यांकडून मारल्याच्या घटनेवरून आकांडतांडव करणारे निधर्मी राजकीय पक्ष, असदुद्दीन औवैसी यांच्यासारखे मुसलमान नेते या घटनेविषयी मात्र मौन बाळगून आहेत, हे लक्षात घ्या !

कृत्रिम मांजा बनवणार्‍या कारखान्‍यांचा शोध घेऊन कारवाई करणार !

कृत्रिम मांजामुळे होणारे वाढते मृत्‍यू रोखण्‍यासाठी राज्‍यशासनाचा निर्णय ! मुंबई, २५ ऑगस्‍ट (वार्ता.) – पतंग उडवण्‍यासाठी वापरण्‍यात येणार्‍या कृत्रिम मांजामुळे राज्‍यात काही नागरिकांच्‍या मृत्‍यूच्‍या घटना घडल्‍या आहेत. मांजामुळे प्रतिवर्षी राज्‍यात शेकडो पक्ष्यांचा मृत्‍यू होतो. या घटना रोखण्‍यासाठी प्‍लास्‍टिक आणि सिंथेटिक धाग्‍यांची निर्मिती करणार्‍या कारखान्‍यांचा शोध घेऊन कारवाई करणारी कार्यप्रणाली राज्‍यशासनाने सिद्ध केली आहे. याविषयी २५ … Read more

जिल्‍हा परिषद शाळांच्‍या रिकाम्‍या खोल्‍या अंगणवाड्यांसाठी वापरणार 

राज्‍यातील अनेक अंगणवाड्या भाडेतत्त्वावरील खोल्‍यांमध्‍ये चालवल्‍या जात आहेत. अंगणवाड्यांना स्‍वमालकीच्‍या इमारतीसह वीज, पाणी आदी पायाभूत सुविधा दिल्‍या पाहिजेत. या अनुषंगाने ग्रामीण भागातील जिल्‍हा परिषद शाळांच्‍या रिकाम्‍या वर्गखोल्‍या अंगणवाड्यांसाठी वापरण्‍याविषयी धोरण सिद्ध करण्‍याचे निर्देश उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी दिले.

अजमेर (राजस्थान) येथे विद्यार्थिनींची कंबर आणि नितंब यांचा आकार मागणार्‍या शाळेच्या विरोधात पालकांचा संताप !

विद्यार्थी-विद्यार्थिनी यांच्या खेळाच्या संदर्भात निर्णय घेण्यासाठी शिक्षण विभागाने काही नियम ठरवून दिले आहेत. त्यांच्याकडे कानाडोळा करून अशा प्रकारे अनावश्यक माहिती मागवणार्‍या शाळा व्यवस्थापनावर कारवाई व्हायला हवी !

‘पालट घडवूया’ अभियानाद्वारे राज्‍यातील ६४ सहस्र शाळांमधील ३८ लाख विद्यार्थी देणार स्‍वच्‍छतेचा संदेश !

विद्यार्थी ‘स्‍वच्‍छता मॉनिटर्स’ म्‍हणून काम करणार आहेत. सह्याद्री अतिथीगृह येथे २३ ऑगस्‍ट या दिवशी या उपक्रमाचा शुभारंभ झाला. या वेळी मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘या अभियानाद्वारे राज्‍यातील स्‍वच्‍छतेमध्‍ये आमूलाग्र पालट होईल’, असा विश्‍वास व्‍यक्‍त केला आहे.

कल्‍याण येथे शिक्षकाकडून ५ वर्षीय विद्यार्थ्‍यावर लैंगिक अत्‍याचाराचा प्रयत्न !

असे वासनांध शिक्षक म्‍हणजे शिक्षण विभागाला लागलेला कलंकच !
अशांना बडतर्फच करायला हवे !

गोवा : विद्यार्थ्यांचे निलंबन मागे घेण्याची बाल हक्क आयोगाची मागणी

बाल हक्क आयोग किंवा मानवाधिकार आयोग यांना गुन्ह्यामुळे पीडित झालेल्यांचा कळवळा न येता गुन्हे करणार्‍यांचा कळवळा कसा काय येतो ?

हा तर गुरुजन आणि शाळा यांच्‍या प्रती कृतज्ञता व्‍यक्‍त करण्‍याचा प्रयत्न ! – शशिकांत केळकर

कोकरे येथील ‘जनता शिक्षण प्रसारक मंडळा’च्‍या ‘जनता माध्‍यमिक विद्यालया’च्‍या वतीने १५ ऑगस्‍टनिमित्त ध्‍वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. या वेळी शिक्षण संस्‍थेचे अध्‍यक्ष सुनील दळवी, शाळेचे माजी विद्यार्थी आणि सनातनचे साधक शशिकांत अनंत केळकर, नुकतेच सनदी लेखापाल (चार्टर्ड अकाऊंटंट) परीक्षा उत्तीर्ण झालेले माजी विद्यार्थी अविनाश चौधरी उपस्‍थित होते. 

सातारा जिल्ह्यात राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना रोखण्यासाठी ठिकठिकाणी निवेदन सादर !

विविध शाळांमध्ये समितीच्या वतीने विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत होण्यासाठी प्रवचन, तसेच ‘राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्या चित्रांचे फ्लेक्स प्रदर्शन’ लावण्यात आले. यास विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.