हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !
हनुमान जयंतीच्या दिवशी मिरा रोड (जिल्हा ठाणे) येथे मशिदीजवळून दुचाकीवरून जाणार्या काही हिंदूंनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने मुसलमानांच्या दबावामुळे पोलिसांनी त्यांना अटक करून ५ दिवस कोठडीत ठेवले.
हनुमान जयंतीच्या दिवशी मिरा रोड (जिल्हा ठाणे) येथे मशिदीजवळून दुचाकीवरून जाणार्या काही हिंदूंनी ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याने मुसलमानांच्या दबावामुळे पोलिसांनी त्यांना अटक करून ५ दिवस कोठडीत ठेवले.
भारतात मुसलमानांच्या विरोधात हिंसाचार झाला असता, तर त्यांची लोकसंख्या एवढी वाढली असती का ? जगातील दुसर्या क्रमांकाची मुसलमानांची लोकसंख्या भारतात आहे, असे विधान भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी अमेरिकेत केले.
जमशेदपूर (झारखंड) येथे श्रीरामनवमीनिमित्त लावण्यात आलेल्या धर्मध्वजाचा धर्मांध मुसलमानांनी अवमान केल्यामुळे येथे हिंसाचार झाला. धर्मांधांनी हनुमान मंदिरावर दगडफेक केली.
‘किसी का भाई किसी की जान’ या आगामी हिंदी चित्रपटातील गाण्यामध्ये हिंदूंच्या मंदिरात लुंगी, चपला आणि बूट घालून अभिनेता सलमान खान, वेंकटेश आणि रामचरण अश्लील पद्धतीने नाचत आहेत.
तमिळनाडूच्या डिंडीगुल जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष मणीकंदन यांनी ‘काँग्रेसची सत्ता आल्यावर राहुल गांधी यांना २ वर्षांची शिक्षा देणार्या न्यायाधिशांची जीभ कापण्यात येईल’, अशी धमकी दिली आहे.
अमेरिकेच्या मेरीलँड राज्यात वर्ष १९४० पासून कॅथॉलिक चर्चमध्ये ६०० पेक्षा अधिक मुलांचे १५० पाद्र्यांकडून लैंगिक शोषण करण्यात आले.
भाग्यनगर (तेलंगाणा) येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजा सिंह यांना पोलिसांनी हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून अटक करून सायंकाळी सुटका केली.
भारतातील मुसलमानांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात आहे, असे ‘ओआयसी’ या इस्लामी देशांच्या संघटनेने म्हटले आहे.
बिहारमध्ये श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमणे करून बाँबस्फोटही घडवले. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे (‘राजद’चे) आमदार नेहालुद्दीन यांनी ‘मुसलमान तरुण स्वसंरक्षणार्थ बाँब बनवत होते’, असे विधान केले आहे.
‘पाकिस्तानात आमचे काहीच भवितव्य नाही. फाळणीच्या वेळी आमचे पूर्वज उज्ज्वल भवितव्यासाठी भारतातून येथे आले; मात्र आमच्या आजोबांनी आमचे भविष्य बिघडवले’, असे ट्वीट पाकमधील प्रसिद्ध पत्रकार आरजू काझमी यांनी केले आहे.