ईश्‍वरप्राप्ती करून देणार्‍या संतांचे महत्त्व जाणा !

ईश्‍वरप्राप्ती करून देणार्‍या संतांचे महत्त्व जाणा !

‘कुठे स्वेच्छेने वागण्यास उत्तेजन देऊन मानवाला अधोगतीला नेणारे बुद्धीप्रामाण्यवादी, तर कुठे मानवाला स्वेच्छेचा त्याग करायला शिकवून ईश्‍वरप्राप्ती करून देणारे संत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्वराची कृपा होण्यासाठी काय करावे ?

ईश्वराची कृपा होण्यासाठी काय करावे ?

‘तन, मन, धन आणि अहं यांचा त्याग झाला अन् ईश्‍वराप्रती भाव अन् भक्ती वाढली की, ईश्‍वराची कृपा होते.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्‍वरप्राप्ती ही पूर्णकालीन साधना !

ईश्‍वरप्राप्ती ही पूर्णकालीन साधना !

‘ईश्‍वरप्राप्ती हे अर्धवेळ काम (Part time job) नसून ती पूर्णकालीन साधना आहे. यासाठी आपली प्रत्येक कृती आपण भक्तीभावाने केली पाहिजे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदूंनो, काळाप्रमाणे साधना पालटते, हे लक्षात घ्या !

हिंदूंनो, काळाप्रमाणे साधना पालटते, हे लक्षात घ्या !

‘संपत्काळात, म्हणजे पूर्वीच्या युगांत ‘गोदान देणे’ही साधना होती. आता आपत्काळात गायींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असतांना ‘गोदान देणे’ नव्हे, तर ‘गोरक्षण करणे’ महत्त्वाचे आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

ईश्‍वरी राज्यात असे नसेल !

ईश्‍वरी राज्यात असे नसेल !

‘पोलीस आणि न्यायाधीश यांना साधना शिकवली असती, तर त्यांना एका क्षणात ‘गुन्हेगार कोण आहे’, हे कळले असते. साधनेअभावी जनतेचे कोट्यवधी रुपये केवळ तपासासाठी खर्च होत आहेत. ईश्‍वरी राज्यात असे नसेल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

भारत अधोगतीच्या परमावधीला जाण्यामागील कारण !

भारत अधोगतीच्या परमावधीला जाण्यामागील कारण !

‘पूर्वीचे राजे राज्याचा त्याग करून वानप्रस्थाश्रम स्वीकारायचे आणि अरण्यात जायचे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या एकातरी शासनकर्त्याने असे केले आहे का ? त्यांच्यामुळेच भारत अधोगतीच्या परमावधीला गेला आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हे शाळांना लज्जास्पद !

हे शाळांना लज्जास्पद !

‘विद्यार्थ्यांना खासगी शिकवणीला जावे लागते, हे शाळांना लज्जास्पद ! गुरुकुल काळात खासगी शिकवण्या नव्हत्या.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

विज्ञान आणि अध्यात्म यांतील भेद !

विज्ञान आणि अध्यात्म यांतील भेद !

‘विज्ञानात ‘प्रयोग करणे, आकडेवारी जमा करून तिचे विश्‍लेषण करणे’ इत्यादी करून निष्कर्ष काढतात. या उलट अध्यात्मात तत्काळ निष्कर्ष कळतो !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

हिंदु राष्ट्रात इंग्रजी भाषा नसेल !

हिंदु राष्ट्रात इंग्रजी भाषा नसेल !

‘हिंदूंनो, हिंदु राष्ट्रात गुलामगिरी दर्शवणारी आणि रज-तमप्रधान इंग्रजी भाषा भारतात नसेल. राज्यांच्या भाषा प्रशासकीय भाषा असतील. त्यामुळे पुढे तुमच्या मुलाला ‘नोकरी मिळावी’, असे वाटत असल्यास त्याला आताच भारतीय राज्यभाषेत शिक्षण द्या.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

अध्यात्माचे अद्वितीयत्व !

अध्यात्माचे अद्वितीयत्व !

‘कोणत्याही गोष्टीचे मूळ कारण न शोधता त्यावर आधुनिक वैद्य, न्यायाधीश, सरकार इत्यादी सर्वच केवळ वरवरचे उपाय करतात. याउलट व्यष्टी आणि समष्टी प्रारब्ध, देवाण-घेवाण हिशोब, काळ इत्यादी मूलभूत कारणे लक्षात घेऊन त्यांवरील उपाय फक्त अध्यात्मच सांगू शकते !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले