मनगटाचा अस्थीभंग झाल्यावर सकारात्मक आणि भावस्थितीत राहून अखंड गुरुकृपा अनुभवणार्‍या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या शिवमोग्गा (कर्नाटक) येथील सौ. स्मिता कानडे (वय ५६ वर्षे) !

रुग्णालयात जातांना भगवंताने मला विचार दिला, ‘प्रारब्ध आनंदाने आणि भावाच्या स्थितीत राहून भोगूया.’ भगवंतानेच माझ्याकडून भावाचे प्रयत्न करून घेतले. यासाठी भगवंत आणि गुरुदेव यांच्या चरणी कितीही वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्रीमती वसुधा देशपांडे (वय ७० वर्षे) यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

साधारण दीड वर्षापासून नामजप करायला लागल्यानंतर तंबोर्‍याची तार छेडल्यासारखे होऊन शरिरातून सूक्ष्म आवाज येतो आणि कंप होतो. त्यामुळे मला त्रास न होता आनंद होतो.

गॅसवरील कढई वाकडी होऊन उकळते तेल हातावर पडतांना घाटकोपर, मुंबई येथील कु. आदिनाथ बांगर याने अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची कृपा !

कढईतील उकळते तेल हातावर पडल्यामुळे मला पुष्कळ त्रास होत होता. घरी आल्यानंतर माझा नामजप आपोआप चालू झाला आणि नामजपामुळे मला होणारा त्रास पुष्कळ प्रमाणात उणावला. गुरुदेवांच्या कृपेमुळे ही अनुभूती आल्याने त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो !

हसतमुख अन् सर्वांशी जवळीक साधणारे चि. राजेंद्र दुसाने आणि प्रेमळ अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्‍या ६० टक्के आध्यात्मिक पातळीच्या चि.सौ.कां. दीपाली माळी !

सनातनचे साधक चि. राजेंद्र दुसाने आणि साधिका चि.सौ.कां. दीपाली माळी यांना शुभविवाहानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !

नम्र अन् साधकांना साधनेत साहाय्य करणारे चि. विनय कुमार आणि भावपूर्ण अन् परिपूर्ण सेवा करणार्‍या चि.सौ.कां. वृषाली कुंभार !

वृषाली कुठलीही सेवा करतांना ती नीट समजून घेते आणि त्यातील बारकावे शिकून घेऊन सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तिच्याकडे संतांच्या सेवेचे दायित्व आहे.

निरपेक्ष, अनासक्त आणि ईश्वरावर दृढ श्रद्धा असणारे चिराला (जिल्हा प्रकाशम्, आंध्रप्रदेश) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्रीबदरी नारायण आरवल्ली (वय ५२ वर्षे) !

मामा प्रतिदिन घरात वैष्णव संप्रदायानुसार भावपूर्ण पूजा करतात. त्यामुळे त्यांच्या घरातील चैतन्य वाढले आहे. तिरुपति वेंकटेश्वर स्वामीच्या मंदिरात जसा चंदन आणि तुळस यांचा सुगंध येतो, तसाच सुगंध त्यांच्या देवघरातही येतो.

सतत साधकांच्या उद्धाराचा विचार करणार्‍या आणि उच्च आध्यात्मिक अधिकार असूनही अतिशय विनम्र असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ !

‘२६.८.२०२३ या दिवशी श्री गुरुकृपेने मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ यांचा अमूल्य सत्संग लाभला. त्यांनी मला केलेले मार्गदर्शन आणि मला त्यांच्याविषयी जाणवलेली अन् त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे मी कृतज्ञताभावाने श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

मनी तुमच्या ठेवा हा भाव ।

‘एका साधकाला त्याच्या चुका सांगितल्यावर त्याच्या मनात काही क्षण विकल्प निर्माण झाले. तेव्हा त्याला समजावतांना सुचलेल्या ओळी येथे दिल्या आहेत.

सनातन-निर्मित देवतांची चित्रे, सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांतील चैतन्यामुळे साधना अन् सेवा करण्यास आरंभ होणे

मी सनातनची सर्व उत्पादने घेतली, उदा. उदबत्ती, कापूर, अष्टगंध, कुंकू, साबण. तेव्हा मला त्या उत्पादनांमधूनही चैतन्य जाणवले. तेव्हा ‘मन एकाग्र होणे, नामजप आणि प्रार्थना करतांना चित्ताची एकाग्रता, उत्साह, आनंद अन् शांती’, असे मला जाणवायला लागले.

पूर्ण वेळ साधना करण्यास आरंभ केल्यावर गोवा येथील श्री. अरुण कुलकर्णी यांना झालेले त्रास आणि गुरुकृपेने त्यांना आलेल्या अनुभूती

साधनेत पूर्णवेळ होण्याचा निर्णय घेतल्यापासून मला शारीरिक आजार चालू झाले. ‘उच्च रक्तदाबा’चे निदान झाले. मी नवी मुंबई येथील एका पुलावर चक्कर येऊन पडलो आणि बेशुद्ध झालो.