शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांच्या विरोधात बलात्काराची तक्रार !

आरोप निराधार असल्याचे खासदार शेवाळेंचे स्पष्टीकरण !

‘फोन टॅपिंग’ प्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट !

राज्यातील ‘फोन टॅपिंग’ प्रकरणी कुलाबा पोलिसांनी २८ एप्रिल या दिवशी न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले आहे. या प्रकरणी कुलाबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.

कोरेगाव भीमा घटनेत माझा कोणत्याही पक्षावर आरोप नाही ! – शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष

कोरेगाव भीमा येथे एकामागोमाग एक घडलेल्या घटनेविषयी मला वैयक्तिक कोणतेही ज्ञान अथवा माहिती नाही. या घटनेमागे कोणत्याही पक्षाचा ‘अजेंडा’ किंवा उद्देश याविषयी माझे आरोप नसल्याचे स्पष्टीकरण देत स्वत:च्या भूमिकेवरून घुमजाव केले.

भोंग्यांविषयी राष्ट्रीय धोरण निश्चित करावे ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

महाराष्ट्रात जात आणि धर्म यांवरून राजकारण केले जात आहे. भोंग्यांविषयी केंद्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा आहे. यासाठी भोग्यांविषयी राष्ट्रीय धोरण निश्चित करणे आवश्यक आहे

दंड रहित करण्याच्या मंत्रीमंडळाचा निर्णयाला किरीट सोमय्या यांचे न्यायालयात आव्हान !

ठाणे येथील विहंग गार्डन इमारतीमधील अनधिकृत बांधकामाप्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांच्या आस्थापनाला ठाणे महापालिकेने १८ कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. तो रहित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला

नवनीत राणा यांचे आक्षेपार्ह छायाचित्र प्रसारित केल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा नोंद !

खासदार नवनीत राणा यांचे आक्षेपार्ह छायाचित्र सामाजिक माध्यमांवर प्रसारित करून त्यांची अपर्कीती केल्याप्रकरणी राजा पेठ पोलीस ठाण्यात २८ एप्रिल या दिवशी तक्रार करण्यात आली होती.

राज्यातील अनधिकृत भोंग्यांविषयी ८ वर्षांत १८ आदेश !

अनधिकृत भोंग्यांविषयी पोलीस प्रशासनाची उदासीनता !

इंधन आणि किराणा माल दरवाढीमुळे स्नेहभोजनाच्या दरात ४० टक्के वाढ !

इंधन दरवाढीसमवेतच खाद्यतेल, बासमती तांदूळ, भाजीपाला, मजुरी यांचे दर वाढल्याने कार्यालयातील स्नेहभोजनाचे दरही २५ ते ४० टक्क्यांनी वाढले आहेत. २ मासांपासून गॅस सिलेंडर, डिझेलसह इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.

संभाजीनगर येथील राज ठाकरे यांच्या सभेला २ सहस्र पोलिसांचा वेढा !

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे या दिवशी होणाऱ्या बहुचर्चित सभेला २८ एप्रिलच्या रात्री ८ वाजता पोलिसांनी १५ अटींसह अनुमती दिली आहे. त्यासाठी आयुक्तालयात सकाळपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या किमान ३ बैठका झाल्या.

भंडारा येथे उपविभागीय अधिकाऱ्यांवर आक्रमण करणाऱ्या आरोपीसमवेत जेवणारे ३ पोलीस कर्मचारी निलंबित !

वाळू माफियासमवेत जेवतांना पोलिसांना काहीच कसे वाटत नाही ? गुन्हेगारांसमवेत पोलिसांचेच ‘जिव्हाळ्या’चे संबंध असतील, तर असे पोलीस वाळू माफियांवर कठोर कारवाई करतील का ? सरकारने अशा पोलिसांना निलंबित करण्याऐवजी बडतर्फ करून त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा केली पाहिजे !