भोंग्यांविषयी राष्ट्रीय धोरण निश्चित करावे ! – खासदार संजय राऊत, शिवसेना

मुंबई – महाराष्ट्रात जात आणि धर्म यांवरून राजकारण केले जात आहे. भोंग्यांविषयी केंद्रशासनाचा निर्णय महत्त्वाचा आहे. यासाठी भोग्यांविषयी राष्ट्रीय धोरण निश्चित करणे आवश्यक आहे, असे मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. २९ एप्रिल या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना ते बोलत होते.