विजेची बचतही आवश्यक !

प्रत्येकाने घरामध्ये विजेचा वापर करतांना काळजी घ्यायला हवी. आवश्यकता नसल्यास तात्काळ वीज उपकरणे, उदा. पंखा, दिवे बंद करणे, तसेच वातानुकूलित यंत्राचा वापरही आवश्यकता असल्यासच करणे.

‘महाराष्ट्र केसरी’चा योग्य सन्मान हवा !

अनेक मल्लांना धोबीपछाड करत पृथ्वीराज पाटीलही ‘महाराष्ट्र केसरी’ झाले; मात्र त्यांच्या घामाला योग्य सन्मान मिळाला नाही, असे वाटल्यास चुकीचे ते काय ?

विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने घडवा !

विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ या विषयावर बोलतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘विद्यार्थ्यांच्या मनाची एकाग्रता का होत नाही ? परीक्षांची भीती का वाटते ? परीक्षेला सामोरे कसे जावे ? खरा आनंद कशामध्ये आहे ?’, या आणि यांसारख्या अनेक सूत्रांवर चर्चा केली.

सौंदर्य स्पर्धा नको !

सौदर्यं स्पर्धांमुळे मुलींवर आणि लहान मुलांवरही अयोग्य संस्कार होणार, हे नक्की ! सद्यःस्थितीत जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर लहानपणापासूनच हिंदवी स्वराज्य आणि हिंदु धर्म यांचे संस्कार केले, तसे संस्कार करणे आवश्यक आहे. राणी लक्ष्मीबाई, राणी चेन्नम्मा, अहिल्यादेवी होळकर यांसारख्या कर्तृत्ववान विरांगनांचे अनुकरण करण्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या स्पर्धा भरवणेच योग्य !

वाढदिवसाची विकृती !

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे वर्षातून एकदा व्यक्तीला शुभेच्छा देण्यासाठीच्या चांगल्या कृतीची जागा भयावह विकृतीने घेतली आहे. समाजामध्ये या विकृतींविषयी जनजागृती न केल्यास आणि धर्मशिक्षण न दिल्यास या पुढचे अपप्रकार पहायला मिळाले नाही तर नवलच ! अशी वेळ न येण्यासाठी हिंदु धर्मानुसार वाढदिवस कसा साजरा करावा, हे सांगणे आवश्यक !

चिमण्या वाचवा !

निसर्गातील प्रत्येक सूक्ष्मातीसूक्ष्म जिवाचे नैसर्गिक जीवनचक्र चालवण्यात मोठा वाटा असतो. यामुळे आपणही उन्हाळ्यात चिमण्यांसाठी आगाशीत पाणी ठेवूया. त्यांच्यासाठी घरटे, खाद्य ठेवू शकतो. मुख्यतः आपली प्रगती म्हणजे दुसर्‍या जिवाची, निसर्गाची अधोगती करणे नव्हे !

आदर्श समाजासाठी धर्मशिक्षणच हवे !

शिक्षक मुलांच्या जीवनात गुरु असतात आणि ते विद्यार्थ्याला योग्य दिशा देण्यासह मार्गदर्शन करतात. या जगात गुरु-शिष्य हे नाते सर्वांत पवित्र मानलेले आहे; पण दुर्दैवाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेतील शिक्षकांची चारित्र्य पडताळणी करावी लागत आहे. याहून समाजाचे दुसरे अधःपतन काय असू शकते ? अशी वेळ का आली ?

भ्रष्टाचार्‍यांना शिक्षा हवीच !

गुन्हेगारांना कायद्याचे भय न वाटण्यामागील कारणांचा अभ्यास करून त्यामध्येही सुधारणा करायला हवी, असे जनतेला वाटते. ही सर्व प्रक्रिया तत्त्वनिष्ठपणे आणि प्रामाणिकपणे केली, तरच देशातील भ्रष्टाचार अन् गुन्हेगारी संपेल, हे नक्की !

पालकांचे दायित्व आणि कर्तव्य !

सुसंस्कार, सुसंवाद, सुनियोजन या तिन्ही गोष्टी साध्य केल्यास मुले नक्कीच आदर्शत्वाकडे वाटचाल करतील. शेवटी एकच सांगावेसे वाटते, ‘आपल्याला वस्तू तोडणाऱ्या नव्हे, तर देशाचे भवितव्य घडवणाऱ्या हातांची आवश्यकता आहे आणि या हातांना बळ देणारे हात सक्षम अन् सजग पालकांचेच असायला हवेत !’

गडदुर्गांचे पावित्र्य जपा !

आपण आपल्या शिवरायांच्या गडदुर्गांविषयी किती प्रमाणात जागृत असायला हवे ? याचा प्रत्येकाने विचार करायला हवा. चांगले आदर्श नेहमी समोर ठेवून गडदुर्गच काय, तर आपला देशही स्वच्छ ठेवणे, हे आपले दायित्व आहे, हे ओळखून त्यासाठी प्रयत्नरत रहायला हवे.