असुरक्षित पोलीस !

‘अतिक्रमण करणे चुकीचे आहे’, हे ठाऊक असूनही आणि भर रस्‍त्‍यात अतिक्रमण होत असतांनाही प्रशासन त्‍याची वेळीच नोंद घेत नाही, हेही अनाकलनीय आहे. एकूणच असुरक्षित पोलीस ही भारतासाठी धोक्‍याची घंटा आहे, हे नक्‍की !

निमंत्रणपत्रिका कशासाठी ?

विवाह हा मनोरंजनाचा आणि बडेजाव करण्‍याचा विषय बनत चालला आहे. हे सर्व थांबण्‍यासाठी समाजाला धर्मशिक्षण देणे आवश्‍यक आहे. धर्मशिक्षणाने व्‍यक्‍तीला कुठे आणि कसे वागायला हवे ? याची जाणीव होईल. यामुळे सरकारने आणि प्रत्‍येक व्‍यक्‍तीने धर्मशिक्षण घेण्‍यासाठी प्रयत्न करायला हवेत !

धार्मिक स्‍थळे दुर्लक्षित का ?

हिंदूंंनी आपला हा प्राचीन वारसा जपण्‍यासाठी एकजूट होऊन प्रयत्न केल्‍यास मंदिरांचे वैभव जपण्‍यासाठी निश्‍चितच साहाय्‍य होईल. जनतेला धर्मशिक्षण दिले असते, तर मंदिरांचे महत्त्व लक्षात आले असते आणि जनतेनेच मंदिरांचे संवर्धन केले असते !

बनावट शाळांना अटकाव हवाच !

राज्‍यात ७५ सहस्रांहून अधिक विद्यार्थी हे मदरसा आणि अमान्‍यताप्राप्‍त शाळांमधून शिक्षण घेत आहेत, ही गोष्‍टही गंभीर आहे. अनधिकृत शाळा बंद केल्‍या पाहिजेत; कारण बनावट शाळांमधून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्‍यांचे भविष्‍य धोक्‍यात येऊ शकते.

वीटभट्टी कामगारांची समस्‍या !

वीटभट्टी व्‍यवसाय बंद पडल्‍यास बांधकामे बंद पडतील. त्‍यामुळे भविष्‍यात बांधकाम व्‍यवसायावरही गंभीर परिणाम होऊ शकतो. त्‍यामुळे अर्थचक्र फिरते रहाण्‍यासाठी या उद्योगाला राजाश्रय हवा, तरच वीटभट्टी कामगारांवर आलेली उपासमारीची वेळ टळून त्‍यांना मुबलक रोजगार उपलब्‍ध होईल, हे निश्‍चित !

‘ऑनलाईन खेळ’ एक जुगार ?

ऑनलाईन गेम खेळून पैसे मिळवण्‍याचा मार्ग सुकर वाटला, तरी तो रसातळाला नेणारा असल्‍याने याचे धोके ओळखून सावध होणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे ऑनलाईन गेमवर सरकारने कठोर कारवाई करावी आणि यातून धर्मशिक्षणाची अपरिहार्यता लक्षात घ्‍यावी !

शेतीवर बांध न घालणारे मंगळवेढावासिय !

अन्‍य गावाच्‍या शेतकर्‍यांनीही मंगळवेढा गावाचा आदर्श घेऊन मनाचे बांध तोडून शेतीच्‍या बांधावरून होणारे वाद रोखावेत !

आधुनिक वैद्यांची ग्रामीण भागातील रुग्‍णसेवा ?

आधुनिक वैद्यांना ग्रामीण भागात जाण्‍याचे महत्त्व सांगणे आणि ते का जात नाहीत ? याचा अभ्‍यास करून ती कारणे दूर करणे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे. काही कालावधीसाठीही ग्रामीण भागात जाण्‍यास नाकारणारे आधुनिक वैद्य, हे मिळवलेल्‍या पदवीला खर्‍या अर्थाने न्‍याय देत आहेत का ? हे महत्त्वाचे !

नद्यांचे प्रदूषण ?

नद्यांमध्‍ये असलेल्‍या गाळामुळे त्‍यांची वहन, साठवण क्षमता न्‍यून होणे, असे गंभीर दुष्‍परिणाम होत असल्‍याचे दिसून येत आहेत. या पार्श्‍वभूमीवर नदीच्‍या समस्‍यांचा अभ्‍यास करून त्‍या सोडवण्‍यासाठी ‘चला जाणूया नदीला’, या अभियानाला प्रारंभ करण्‍यात आला आहे.

लाच घेणार्‍यांची पाठराखण का ?

देशातील भ्रष्‍टाचार संपवण्‍यासाठी प्रत्‍येकाने आपली मानसिकता पालटून ‘लाच घेणारा व्‍यक्‍ती आणि त्‍याचे कुटुंबीय यांनाच त्रास होईल’, असा विचार केल्‍यास प्रत्‍येक व्‍यक्‍ती कोणत्‍या ना कोणत्‍या कारणाने लाच घेण्‍यापासून लांब राहील, हे नक्‍की !