देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या २ सहस्र ९७२, मृतांची संख्या ७५

देशभरात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या २४ घंट्यांत १२ जणांचा मृत्यू. ही संख्या एका दिवसातील सर्वाधिक आहे,

‘अल्कोहल विथड्रॉवल सिंड्रोम’ पीडितांना मद्य विकण्यावर केरळ उच्च न्यायालयाची स्थगिती

‘अल्कोहल विथड्रॉवल सिंड्रोम’ (दारु पिणे थांबवल्यानंतर व्यक्तीत दिसणारी लक्षणे) या आजाराने पीडित असणार्‍यांना मद्य विकण्याच्या ठेवण्याच्या केरळ सरकारच्या निर्णयाला केरळ उच्च न्यायालयाने ३ आठवड्यांसाठी स्थगिती दिली.

 मुंबईत एका दिवसात आढळले ५७ रुग्ण , राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ४१६

२ एप्रिलला सायंकाळपर्यंत राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४१६ पर्यंत पोचली.

दाभोळ (दापोली) येथे सागरी पोलीस सतर्क : २५ पेक्षा अधिक युवकांचे पोलिसांना साहाय्य

कोरोनाच्या नियंत्रणासाठी संपूर्ण देशभर दळणवळण बंदीचे आदेश शासनाने दिलेले आहेत. या आदेशाचे पालन करण्यासाठी दाभोळ सागरी पोलीस सतर्क झाले आहेत. या पोलिसांना दाभोळ पंचक्रोशीतील २५ पेक्षा अधिक युवक आणि ग्रामस्थ पोलीस मित्र बनवून सहकार्य करत आहेत.

वसईत पोलिसांवर आक्रमण करणार्‍या दोघांना अटक

पोलिसांवर आक्रमण करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच पोलिसांवर आक्रमण होण्याच्या घटना वाढत आहेत !

कोरोना विषाणूशी लढण्यासाठी भारत सिद्ध करणार ‘हजमत सूट’ !

कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणार्‍या भारतातील डॉक्टरांसाठी संरक्षक कवच म्हणून ‘हजमत सूट’ (पोशाख) देशातच सिद्ध करण्यात येणार आहे. सध्या अनेक देशांत या पोशाखाचा वापर केला जातो. ‘इबोला’, ‘कोरोना’ यांसारख्या विषाणूंचे संक्रमण झालेल्या रुग्णांवर उपचार करणारे आधुनिक वैद्य आणि…

देशात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण

देशभरात आतापर्यंत १ सहस्र ४० जणांना कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय कोरोनामुळे आतापर्यंत एकूण २६ जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आत्मबळ वाढवण्याची आवश्यकता  ! – श्री श्री रविशंकर, आर्ट ऑफ लिव्हिंग

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी आत्मबळ वाढवण्याची आवश्यकता आहे. मनात भीती निर्माण झाली, तर रोगप्रतिकारशक्ती न्यून होते. त्यामुळे आपल्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत.

राज्यातील १४ जिल्ह्यांतील शेतकर्‍यांना स्वस्त धान्य उपलब्ध

या योजनेच्या माध्यमातून विदर्भ आणि मराठवाडा येथील शेतकर्‍यांना एप्रिल, मे आणि जून २०२० या ३ मासांकरिता सवलतीच्या दरात गहू आणि तांदूळ प्रतिव्यक्ती ५ किलो उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अन्न, नागरीपुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

नाशिक येथे विनाकारण दुचाकी रस्त्यांवर आणल्यास पुढील ३ मासांसाठी दुचाकी जप्त होणार

दळणवळण बंदीच्या पार्श्‍वभूमीवर शहरात वारंवार सांगूनही दुचाकींचा वापर सर्रास चालूच असल्यामुळे आता विनाकारण कोणी दुचाकी रस्त्यांवर आणल्यास पुढील ३ मासांकरिता दुचाकी जप्त होणार आहे.