पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनस्थळी वैयक्तिक लक्ष द्यावे ! – उल्हास जगताप, अतिरिक्त आयुक्त

‘जनसंवाद सभे’ मध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन घाटांवर महापालिकेने विसर्जनाच्या पुढील दिवसांसाठी अधिक मनुष्यबळासह सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली.

नागपूर येथील कोराडी तलावाजवळील नांदा परिसरात ४ सहस्र राष्ट्रध्वज पोत्यात भरून फेकले !

स्वातंत्र्याच्या ‘अमृत महोत्सवा’निमित्त देशात ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबवण्यात आली होती. कोट्यवधी लोकांनी स्वतःच्या घरावर तिरंगा ध्वज लावला होता. अनेकांना ध्वज उपलब्ध झाले नव्हते. ‘हर घर तिरंगा’ मोहिमेमुळे देशभावना जागृत होईल, असा त्यामागचा उद्देश होता;

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील खटला कोल्हापुरात चालवण्यासाठी शासनाकडे आवेदन सादर केल्याची आतंकवादविरोधी पथकाची न्यायालयात माहिती !

कॉ. पानसरे हत्या प्रकरणातील खटला कोल्हापूर येथील न्यायालयात चालवावा, असा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे, अशी माहिती राज्य आतंकवादविरोधी पथकाने न्यायालयात दिली. पथकाच्या वतीने पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी न्यायालयात ही माहिती दिली.

गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज सत्र न्यायालयाने फेटाळला !

कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी गौतम नवलखा यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयातील राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (एन्.आय.ए.) न्यायालयाने ५ सप्टेंबर या दिवशी फेटाळला आहे.

ट्रॅकमन्समुळे रेल्वेचा अपघात टळला

कल्याण येथे जलद डाऊन मार्गावरील रेल्वेच्या रुळाला तडा गेल्याचे लक्षात आल्यानंतर कर्तव्यावर असलेल्या २ ट्रॅकमन्सनी (रूळ दुरुस्त करणारे कर्मचारी)  प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेत लाल सिग्नल दाखवून एक्सप्रेस थांबवण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

मंचर, चाकण येथील २ मिठाई विक्रेत्यांवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !

स्वीट खव्याचा (गुजरात बर्फी) वापर करून मिठाई बनवत असल्याचे आढळल्यास मिठाई विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येईल, असे अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी कळवले आहे.

पुण्यातील मानाच्या श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या विरोधातील याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

विसर्जन मिरवणुकीच्या वेळी आधी मानाचे ५ गणपति जातील, त्यानंतर लहान गणपति जाणार हे बंधनं का ?, असा प्रश्न अन्य गणेशोत्सव मंडळांकडून करण्यात आला होता. मानाच्या गणपतींच्या अगोदर छोट्या मंडळांना विसर्जन मिरवणुकांची अनुमती द्यावी, अशी त्यांची मागणी होती.

यापुढे लव्ह जिहादमध्ये अडकलेल्या मुलींसाठी कार्य करीन ! – नवनीत राणा, खासदार

आतापर्यंत मी अमरावती येथील लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलींना, त्यांच्या कुटुंबियांना साहाय्य करत आले असून यापुढे जिथे जिथे अशा घटना घडतील तेथील कुटुंबांना मी साहाय्य करणार आहे. देशातील लव्ह जिहाद नष्ट करायचा असून त्याचा प्रारंभ जळगावातून होत आहे.

इचलकरंजी येथे विसर्जनासाठी गेलेला युवक पंचगंगेत बुडाला !

आपत्ती व्यवस्थापनाकडून या युवकाचा शोध चालू आहे.

नागपूर शहर तलावात श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनावर निर्बंध घातल्याने मूर्ती विसर्जनाविषयी गणेशोत्सव मंडळांसमोर पेच !

अनंतचतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाईल. तथापि येथील महानगरपालिकेने शहरातील सर्वच तलावांमध्ये श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनावर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे या वर्षी मूर्तींचे विसर्जन करायचे कुठे ? असा मोठा प्रश्न गणेशोत्सव मंडळांसमोर निर्माण झाला आहे.