
मुंबई – बहुतांश ठिकाणी मतदारांची नावे दुबार असल्याचे उघड होत आहे. मतदानानंतर बोटावर लावण्यात येणारी केवळ शाई पुसली जात नाही, तर लोकशाही पुसली जात आहे. बोटावरील शाई पुसली जात असल्याचे निवडणूक आयोग आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाकारत असतील, तर दोघांची मिलिभगत आहे. आयुक्त राजा नाही, तर मतदारराजा आहे. सध्या मात्र लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी १५ जानेवारी या दिवशी पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेविषयी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आणि भाजपचे नेते आशिष शेलार यांनी ‘मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेणे योग्य आहे का ?’ असा प्रश्न उपस्थित केला.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक