राष्ट्रगीताचा अवमान केल्याच्या प्रकरणात ५७ माजी नगरसेवकांची १९ वर्षांनंतर निर्दाेष मुक्तता !

खटला १९ वर्षे चालला

कोल्हापूर – कोल्हापूर महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रगीताचा अवमान केल्याचा आरोप असलेल्या कोल्हापूर महापालिकेच्या ५७ माजी नगरसेवकांची मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी निर्दाेष मुक्तता केली. यांतील ५७ पैकी ८ नगरसेवक मृत असून ४९ जणांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. २० फेब्रुवारी २००६ या दिवशी मेजर संजय शिंदे यांनी या संदर्भात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती. हा खटला १९ वर्षे चालला आणि आरोप सिद्ध न झाल्याने सर्वांची निर्दाेष मुक्तता करण्यात आली. निर्दाेष झालेल्यांमध्ये संजय पवार, उदय दुधाने, उदय जगताप, राजू आवळे, राजू कसबेकर, अशोक जाधव, विजय साळोखे यांसह अन्यांचा समावेश होता.

संपादकीय भूमिका

१९ वर्षांनंतर मिळणारा न्याय हा अन्याय आहे, असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?