गौहत्ती (आसाम) – आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात सलग दुसर्या दिवशी आदिवासींनी केलेल्या हिंसाचारात २ जणांचा मृत्यू झाला, तर ३७ पोलिसांसह ४५ जण घायाळ झाले. २५ वर्षीय सुरेश डे याचा मृतदेह एका जळालेल्या इमारतीतून बाहेर काढण्यात आला, तर अथिक तिमुंग याचा मृत्यू या संघर्षाच्या वेळी झाला. हिंसाचारात अनेक दुकाने आणि वाहने यांना आग लावण्यात आली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला, तसेच अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. प्रशासनाने कार्बी आंगलोंग आणि पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद केली आहे. परिसरात जमावबंदी लागू असून अतिरिक्त सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.
काय आहे प्रकरण ?
विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांच्याशी संबंधित आदिवासी आंदोलक कार्बी आंगलोंग आणि पश्चिम कार्बी आंगलोंग जिल्ह्यांमधील व्यावसायिक चराई राखीव आणि ग्रामीण चराई राखीव येथे बेकायदेशीरपणे रहाणार्या लोकांना हटवण्याची मागणी करत आहेत. यातून हा हिंसाचार होत आहे. या प्रकरणात भाजपच्या नेत्याचे घरही जाळण्यात आले.

गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
प.पू. डॉ. आठवले हे अवतारी पुरुष आहेत ! – जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
कोल्हापूर-सांगलीतील संशयित देशद्रोही संपर्काची सखोल चौकशी करण्याची मागणी !