
ठाणे, २२ डिसेंबर (वार्ता.) – ठाणे जिल्हा ‘कीर्तन परिषदे’च्या वतीने शहापूर येथे १३ डिसेंबर या दिवशी हिंदु संमेलन आणि घरवापसी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर, भिवंडी, मुरबाड, कल्याण अशा ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागांतून आलेल्या वारकर्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हे संमेलन पार पडले. त्या वेळी धर्मांतरित झालेल्या आदिवासी बांधवांची घरवापसी करण्यात आली.
संमेलनात उपस्थित कीर्तनकारांनी हिंदु धर्म-जागृती, धर्मांतराचा धोका आणि धर्मरक्षणाचे महत्त्व या विषयांवर प्रबोधन केले. आयोजक ह.भ.प. भास्कर महाराज म्हसकर, योगेश महाराज भोईर, विजय डिंगोरे आणि काका जगे यांनी संमेलन यशस्वी केले. जिल्ह्यातील २२ कीर्तनकार या संमेलनात सहभागी झाले होते. ह.भ.प. काळूराम महाराज कशीवले यांचे जागृतीपर कीर्तन विशेष आकर्षण ठरले.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
नवी मुंबईत सत्ताधार्यांच्या १०० दिवसांच्या कामांचा मनसेकडून पंचनामा !
सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतांना पकडलेल्या युवकाची आत्महत्या
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !