माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांचा आरोप

पुणे – मुंढवा येथील सरकारी भूमी अपहार प्रकरणात भूमीचा ताबा मूळ वतनदारांना मिळावा. कब्जा हक्काच्या सार्याची रक्कम भरून मूळ वतनदारांची नावे लावावी, असा मागणी अर्ज शीतल तेजवानी यांनी ‘अमेडिया आस्थापना’कडून जिल्हाधिकार्यांकडे केला होता. हा अर्ज पार्थ पवार यांनी केला असून भूमी मिळवण्यासाठी त्यांनी ४ वर्षांपासून पाठपुरावा केला असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप ‘माहिती अधिकार’ कार्यकर्ते श्री. विजय कुंभार यांनी केला आहे.
श्री. विजय कुंभार म्हणाले, ‘‘वरील स्वरूपाचा अर्ज तेजवानी यांनी १० नोव्हेंबर २०२० या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे केला होता. १५ डिसेंबर २०२० या दिवशी हा अर्ज हवेली तहसीलदार यांच्याकडे वर्ग केला. अर्जातील मिळकतीविषयीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा, असा आदेश दिला. २८ डिसेंबर २०२० या दिवशी ‘अमेडिया’ आस्थापनाची निर्मिती करण्यात आली. त्यानंतर अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला. वर्ष २०२५ मध्ये या मिळकतीचे खरेदीखत करण्यात आले. त्यानंतर ‘अमेडिया’ने भूमी कह्यात घेण्याचा प्रयत्न केला. ५ नोव्हेंबर २०२५ या दिवशी या भूमीचे अपहार प्रकरण प्रसारमाध्यमांमध्ये उजेडात आले. ‘अमेडिया’कडून वृत्तपत्रांमधील वार्तांमुळे आम्ही व्यथीत झालो असून आस्थापनाची बाजू मांडण्यासाठी वेळ द्यावा, अशा मागणीचे पत्र सादर केले. या पत्रावरही पार्थ पवार यांची स्वाक्षरी आहे. त्यामुळे या प्रकरणात पार्थ पवार यांचा सहभाग उघडपणे दिसून येतो.’’
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्यामुळे विद्यार्थांच्या आणि समाजाच्या भवितव्याविषयी प्रश्नचिन्ह !
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !