विधानसभेतील अनेक लक्षवेधींना अद्याप उत्तरे नाहीत !

नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन संपत आले, तरी सदस्यांनी मांडलेल्या अनेक लक्षवेधींना अद्याप उत्तरे देण्यात आलेली नाहीत. भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला. त्यावर १४ डिसेंबर या दिवशी सभागृहाची बैठक संपेपर्यंत या लक्षवेधींची प्रलंबित उत्तरे दिली नाही, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाचा प्रस्ताव आणला जाईल, अशी चेतावणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी १३ डिसेंबर या दिवशी दिली.
याविषयी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेले सूत्र अगदी योग्य आहे. कोणत्याही अधिकार्याला असे वाटत असेल की, विधीमंडळाच्या पीठासीन अधिकार्यांनी दिलेले निर्देश पाळणे बंधनकारक नाही, तर त्यावर कारवाई केली जाईल. उद्या सभागृहाची बैठक संपेपर्यंत सभागृहाच्या पटलावर प्रलंबित लक्षवेधींची उत्तरे आली नाहीत, तर मुख्य सचिवांवर हक्कभंगाची कारवाई केली जाईल, अशी त्यांनी चेतावणी दिली.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !