शेतकर्यांना आंदोलन करण्यास भाग पाडणारे प्रशासन !

वेंगुर्ला – मे आणि जून या महिन्यांत १० ते १५ दिवस अवेळी पाऊस पडल्याने कोकम पिकाची मोठ्या प्रमाणात हानी झाली. शासनाकडून कोकम उत्पादक शेतकर्यांना द्यायची हानीभरपाई संबंधित खात्याकडे प्राप्त झाली आहे. त्यामुळे येत्या ४ दिवसांत शेतकर्यांना हानीभरपाई न मिळाल्यास आंदोलन करण्याची चेतावणी छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेने दिली आहे. याविषयीचे निवेदन संघटनेने तालुका तहसील कार्यालयात दिले आहे.
अवेळी पडलेल्या पावसामुळे झालेल्या कोकमच्या हानीचे पंचनामे करण्यात आले; मात्र शेतकर्यांना हानीभरपाई अद्याप मिळालेली नाही. याविषयी वेळोवेळी प्रशासकीय स्तरावर शेतकर्यांनी संपर्क साधला, तसेच संघटनेच्या माध्यमातून निवेदनही देण्यात आले. तरीही हानीभरपाई मिळाली नाही. वेळोवेळी तांत्रिक कारणे सांगितली जातात. हे शेतकर्यांच्या दृष्टीने योग्य नाही. पुढील हंगाम काही दिवसांत चालू होणार आहे, तरीही याची नोंद कुणी घेत नाही, असे संघटनेने या निवेदनात म्हटले आहे.
निवेदन देतांना छत्रपती शिवाजी महाराज सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्यामसुंदर राय, प्रदीप सावंत, दिगंबर शेटकर, महादेव गावडे, देवीदास गावडे यांच्यासह अन्य शेतकरी उपस्थित होते.
वीजदेयकांविषयीचा प्रश्न सुटेपर्यंत स्मार्टमीटर बसवणे स्थगित ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत
झाराप रेल्वेस्थानकावरून अवैधरित्या होणार्या सहस्रो टन खनिजसदृश मातीच्या वाहतुकीची चौकशी करा !
मोले तपासणीनाक्यावर परराज्यांतील वाहनचालकांकडून पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रीकरण प्रसारित
३७० कलम रहित करणे आणि श्रीराममंदिराची उभारणी, ही पंतप्रधान मोदी यांची महान कार्ये ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत
भायखळा आणि भिवंडी येथे ‘मराठी भाषा प्रशिक्षण केंद्र’ चालू करा ! – आमदार रईस शेख, समाजवादी पक्ष
भेसळ आणि दराच्या वादात गुर्हाळ व्यवसाय संकटात !