
मुंबई, ७ नोव्हेंबर (वार्ता.) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशी गायीच्या संवर्धनाचे आवाहन केले आहे. महाराष्ट्रानेही देशात सर्वप्रथम देशी गायीला राज्यमातेचा दर्जा दिला आहे; मात्र महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाने नवीन बोधचिन्हामध्ये देशी गायीऐवजी जर्सी गायीचे चित्र छापले आहे. विभागाची ही कृती राज्याच्या धोरणाच्या विसंगत आहे. पंतप्रधान आणि राज्यशासन यांच्या देशी गायीच्या संवर्धनाच्या धोरणानुसार कृषी विभागानेही देशी गायीच्या संवर्धनाचा संदेश देणे अपेक्षित आहे.
| या संदर्भात शासनाने काढलेला आदेश –
|
शेतीच्या उत्थनासाठी आणि कालसुसंगत असे स्वत:चे बोधचिन्ह अन् घोषवाक्य कृषी विभागाने प्रकाशित केले आहे. ‘कृषी कल्याण कर्तव्यम्’ हे विभागाचे नवीन घोषवाक्य आहे. विभागाकडून शासन निर्णयाद्वारे नवीन बोधचिन्ह आणि घोषवाक्य घोषित केले आहे. बोधचिन्हावर हातावर असलेले रोप, ट्रॅक्टर आदी चिन्हे देण्यात आली आहेत. शासनाने देशी गायीच्या संवर्धनासाठी गोशाळांतील देशी गायींना प्रती गाय ५० रुपये अनुदान घोषित केले आहे. बोधचिन्ह आणि बोधवाक्य यांची संकल्पना उल्लेखनीय असली, तरी जर्सी गायीचे चित्र राज्यशासनाच्या धोरणाच्या विसंगत वाटते.
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव