
मुंबई / पुणे – ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतीवृष्टीमुळे खरीप पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकर्यांसाठी रब्बी हंगाम महत्त्वाचा आहे. सध्या धरणे, विहिरी तुडुंब भरल्याने शेतकर्यांना या वर्षी पाण्याची फारशी टंचाई भासणार नाही; म्हणून यंदा रब्बी पिकाखालचे क्षेत्र ६५ लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील रब्बी हंगामाचे नियोजन अधिक सक्षम करून शेतकर्यांना थेट लाभ मिळवून देण्यासाठी ठोस उपाययोजना आखण्याच्या सूचना अधिकार्यांना दिल्या आहेत. रब्बी हंगामाची पूर्वसिद्धता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे, अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
‘म्हजे घर’ योजनेनंतर आता सरकारकडून ‘माझा फ्लॅट’ योजनेची घोषणा
नैऋत्य मौसमी पावसाचे (मान्सूनचे) केरळमध्ये आगमन
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखीचे ७ जुलै या दिवशी प्रस्थान !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
मंचर (जिल्हा पुणे) येथे ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन’ कायद्याला मंदिर विश्वस्तांचा विरोध !