आंबिवली (कल्याण) येथील इराणी लोकांकडून बसवर दगडफेक; प्रवासी घायाळ

इराणी वस्ती

ठाणे – देवदर्शन करून आंबिवली येथील अटाळी गावात परतणार्‍या भाविकांच्या बसवर इराणी वस्तीतील काही जणांनी दगडफेक केल्याची घटना घडली. या आक्रमणात दुर्वेश पाटील हे गंभीररित्या घायाळ झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. तक्रारदार रंजना पाटील यांच्या म्हणण्यानुसार बसला ओलांडून एका दुचाकीस्वाराने धोकादायक वळण घेतल्यानंतर हा वाद झाला. त्यानंतर मुंढा नावाच्या तरुणासह १० महिला-पुरुष यांनी बसमधील नागरिकांवर दगडफेक केली. यात कविता पाटील आणि सुवर्णा पाटील याही घायाळ झाल्या आहेत. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेतला असून सीसीटीव्ही चित्रीकरणाच्या आधारे आरोपींचा शोध चालू केला आहे.

संपादकीय भूमिका

गुन्हेगारी प्रवृत्तीच्या धर्मांधांवर कठोर कारवाई होत नसल्यामुळे त्यांना कायद्याचे भय वाटत नाही !