
पुणे – येथील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना विविध शारीरिक त्रास आणि वाहतूककोंडी यांना सामोरे जावे लागते. वेळोवेळी याविषयी तक्रार करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते; मात्र आता पुण्यातील रस्त्यावरील खड्डयांची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. पुणे महापालिकेने नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार करता यावी आणि ते तातडीने बुजवले जावेत, यासाठी ‘रोडमित्र’ नावाचे ‘ॲप’ सिद्ध केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेकडो खड्डे बुजवले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे; पण वस्तूस्थितीत केवळ ‘ॲप’वर येणार्या खड्ड्यांच्या तक्रारीच्या संदर्भातच कारवाई होते. इतर खड्डे बुजवले जात नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
संपादकीय भूमिका :
|
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
पिंपरी-चिंचवडमध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कारवाई !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !