मुख्यमंत्र्यांनीच महापालिकेकडे केली पुण्यातील रस्त्यातील खड्ड्यांची तक्रार

पुणे – येथील रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांना विविध शारीरिक त्रास आणि वाहतूककोंडी यांना सामोरे जावे लागते. वेळोवेळी याविषयी तक्रार करूनही प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष केले जाते; मात्र आता पुण्यातील रस्त्यावरील खड्डयांची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे केली आहे. पुणे महापालिकेने नागरिकांना रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार करता यावी आणि ते तातडीने बुजवले जावेत, यासाठी ‘रोडमित्र’ नावाचे ‘ॲप’ सिद्ध केले आहे. या ॲपच्या माध्यमातून शेकडो खड्डे बुजवले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे; पण वस्तूस्थितीत केवळ ‘ॲप’वर येणार्‍या खड्ड्यांच्या तक्रारीच्या संदर्भातच कारवाई होते. इतर खड्डे बुजवले जात नसल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.

संपादकीय भूमिका :

  • मुख्यमंत्र्यांनी तक्रार करण्यासह रस्त्याचे काम करणार्‍या कामचुकार ठेकेदारांवर कारवाई होण्यासाठी प्रयत्न करावेत, ही नागरिकांची अपेक्षा !
  • जर मुख्यमंत्र्यांनाच खड्ड्यांच्या तक्रारीसाठी महापालिकेचे दार ठोठावावे लागत असेल, तर सामान्य नागरिकांचा आवाज किती दाबला जात असेल, याची कल्पना करणे कठीण नाही. प्रतिवर्षी कोट्यवधी रुपयांचा रस्ते निधी खर्च होतो; पण नागरिकांच्या वाट्याला मिळतात ते केवळ खड्डे आणि अपघात !