श्राद्ध : हिंदु धर्मात सांगितलेला एक परिपूर्ण विधी 

धर्मशास्त्रात तीन पिढ्यांपर्यंत पिंडदान करण्यास सांगितले आहे. त्यांच्या आधीच्या पितरांची गणना दिव्य पितरांमध्ये केलेली आहे, म्हणजेच त्यांना मुक्तरूप मानले आहे. तसेच आपल्या आधीच्या तीन पिढ्यांतील पूर्वजांच्याच आपल्याकडून जास्त अपेक्षा असतात आणि त्या आधीच्या पिढ्यांतील पूर्वजांच्या तेवढ्या अपेक्षा नसतात. श्राद्धात मुख्य पिंड आधीच्या तीन पिढ्यांसाठीच असले, तरी त्या आधीच्या पिढ्यांतील कुणास गती मिळाली नसल्यास त्यांच्यासाठी श्राद्धात धर्मपिंड दिले जातात. अशा प्रकारे श्राद्ध हा हिंदु धर्मात सांगितलेला एक परिपूर्ण विधी आहे.

(संदर्भ : सनातनचा ग्रंथ ‘श्राद्ध भाग २’)