
सांगली – मिरज तालुक्यातील अंकली येथे ६ सप्टेंबर या दिवशी शीतल धनपाल पाटील (वय २५ वर्षे) हा तरुण मिरवणुकीत झालेल्या भांडणात मध्यस्थी करण्यासाठी गेला असतांना त्याच्यावर धारदार शस्त्राने आक्रमण करण्यात आले. गंभीर अवस्थेत त्याला तात्काळ सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले; मात्र उपचार चालू असतांनाच ८ सप्टेंबरच्या रात्री त्याचा मृत्यू झाला. ९ सप्टेंबरच्या सकाळी शीतल पाटील यांचे पार्थिव अंकली गावात आणण्यात आले. या वेळी ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला. ग्रामस्थांनी शीतल यांचे पार्थिव थेट आरोपींच्या घरासमोर ठेवत कडक कारवाईची मागणी केली. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ संशयित विकास घळगे, क्षितिज उपाख्य आप्पा कांबळे आणि आदित्य घळगे या तिघांना अटक केली. त्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमध्ये अवैध मद्यविक्री करणार्यांवर २३ गुन्हे नोंद !
घरपट्टीच्या नोटिसीतील जाचक अटी आणि कालमर्यादा रहित करावी ! – ‘व्यापारी एकता असोसिएशन’ची मागणी
तुर्भे विभागात विद्युत् पुरवठा वारंवार खंडित; जनता त्रस्त !
स्थानांतरासाठी शिक्षकाकडून २५ सहस्र रुपयांची लाच घेतांना अधिकारी डी.सी. कुंभार यांना अटक