Uttarkashi Flood : उत्तरकाशी (उत्तराखंड) येथे पुरामुळे गाव वाहून गेले ! : ४ जणांचा मृत्यू, तर ५० जण बेपत्ता

मुसळधार पावसामुळे वाहणारे पाणी आणि ढिगारा यांमुळे येथील खीर गंगा गाव वाहून गेले !

डेहराडून (उत्तराखंड) : राज्यात असलेल्या उत्तरकाशी जिल्ह्यातील धराली येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहणारे पाणी आणि ढिगारा यांमुळे येथील खीर गंगा गाव वाहून गेले आहे. यात आतापर्यंत ४ जणांचा मृत्यू झाला, तर ५० जण बेपत्ता झाले. ही घटना ५ ऑगस्टच्या दुपारी १.४५ वाजता घडली. अवघ्या काही सेकंदांत ही घटना घडली. सध्या येथे सैन्य, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांची पथके साहाय्यता कार्य करत आहेत.

मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी म्हणाले की,

आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. या पुरामुळे येथील अनेक हॉटेल आणि घरे यांमध्ये पाणी शिरले. येथील घराली बाजारपेठ पूर्णपणे उद्ध्वस्त झाली.