भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांकांना धोका असल्याचा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आरोप केल्याचे प्रकरण

पणजी, ४ ऑगस्ट (वार्ता.) – गोव्यात समान नागरी कायदा लागू आहे. गोव्यात अल्पसंख्यांकांवर अन्याय केला जात नाही आणि असे कधी होणारही नाही. छत्तीसगड येथील घटनेवरून लोकांमध्ये भीती निर्माण करू नये, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ४ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत प्रश्नोत्तर तासाच्या प्रारंभी केले. छत्तीसगड येथे धर्मांतर आणि मानवी तस्करी करणे या आरोपाखाली केरळमधील २ नन्सना कह्यात घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांकांना धोका असल्याचा विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आरोप केला होता. या आरोपाला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत उत्तर देत होते.
प्रारंभी छत्तीसगड येथील घटनेवरून विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले, ‘‘गोव्यातही काही जण छत्तीसगडसारखा प्रकार करण्याची शक्यता वाटते. छत्तीसगड येथील पुनरावृत्ती गोव्यात होणार नाही, याची हमी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी द्यावी.’’
संपादकीय भूमिकाभाजपशासित प्रदेशात अल्पसंख्यांक सुरक्षित आहेत; पण काँग्रेस, तृणमूल आणि साम्यवादी यांचे सरकार असलेल्या कर्नाटक, बंगाल अन् केरळ या राज्यांत हिंदू असुरक्षित आहेत ! |
वडापावसाठी वर्तमानपत्राचा वापर करणार्या विक्रेत्यांवर कारवाई !
वाढत्या मानसिक ताणामुळे ३ वर्षांत देशातील ४३८ सैनिकांच्या आत्महत्या !
चंद्रपूर येथील ‘कॅन्सर रुग्णालया’वर सायबर आक्रमण !
वरळी डोम येथील पाश्चात्त्य संगीत कार्यक्रमात तरुणाचा मृत्यू !
हडफडे आग दुर्घटनेच्या प्रकरणी न्यायदंडाधिकार्यांचा अहवाल झाकलेलाच !
रुमडामळ, मडगाव येथे मुसलमानाकडून गोरक्षक रेडकर यांच्यावर आक्रमण