लोह खाणी उभारण्यासाठी वृक्षतोडीचा निर्णय

गडचिरोली : सरकारने येथे १ लाख वृक्ष तोडण्याची अनुमती दिली आहे. येत्या १५ दिवसांत हे वृक्ष तोडण्यात येतील. सरकारच्या या निर्णयामुळे आदिवासी संतप्त आहेत. येथे लोह खाणी उभारण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
सुरजागड येथे ‘लॉईड्स मेटल्स’ या आस्थापनाने वाढीव उत्खननासाठी राज्य सरकारकडे अनुमती मागितली होती. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या तज्ञ समितीने गडचिरोली जिल्ह्यातील या आस्थापनाचे लोह खनिज उत्पादन १० दशलक्ष टन प्रति वर्षावरून २६ दशलक्ष टन प्रति वर्षापर्यंतच्या उत्पादन वाढीला हिरवा कंदील दाखवला आहे; पण या वृक्षतोडीच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात अनेक याचिका प्रविष्ट आहेत.
वृक्षतोडीमुळे ९३७ हेक्टरवरील जंगल नष्ट होणार आहे. स्थानिक पर्यावरण आणि आदिवासींचे जीवनमान यांवर गंभीर परिणाम होणार आहे. या भागातील ५० सहस्रांहून अधिक आदिवासींना विस्थापित व्हावे लागेल.
![]() Stop the Cutting of 1.25 Lakh Trees in Gadchiroli – Save Forests, Wildlife, and Tribals |
संपादकीय भूमिकासर्व दृष्टीने विचार करून सरकारने हा निर्णय घेतल्याचे गृहीत धरले, तरी वृक्षतोडीचा परिणाम सभोवतालवर होऊ नये, यासाठी जवळच्या क्षेत्रात वृक्ष लावण्याचे नियोजन केले आहे का ? स्थानिक जनतेने यासंदर्भात सरकारला प्रश्न विचारणे आवश्यक ! |

लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’
Sir Tan Se Juda : कल्याण येथे पोलीस ठाण्यात धर्मांध महिलांकडून चिथावणीखोर घोषणा !