Pakistan Lying since birth : पाकिस्तान त्याच्या जन्मापासूनच खोटे बोलत आहे !

‘राफेल’ लढाऊ विमान पाडल्याच्या पाकच्या दाव्यावर भारताचे उत्तर

भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री

नवी देहली – ‘पाकिस्तान दावा करत आहे की, त्याने भारतीय लढाऊ विमाने पाडली आहेत. वास्तव काय आहे ?’ असा प्रश्न भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांना पत्रकार परिषदेत विचारण्यात आला असता ‘योग्य वेळ आल्यावर तुम्हाला अधिकृतपणे कळवले जाईल. पाकिस्तानने त्याच्या जन्मापासूनच खोटे बोलण्यास चालू केले आहे. वर्ष १९४७ मध्ये संयुक्त राष्ट्रांना सांगण्यात आले की, काश्मीरवर आक्रमण करणारे आदिवासी होते. आमच्या सैन्याने तेव्हा पाहिले की, पाकिस्तानचे सैन्य तिथे होते. खोटारडेपणाचा हा प्रवास ७५ वर्षांपूर्वी चालू झाला होता.

संपादकीय भूमिका

वर्ष १९६५ आणि १९७१ च्या युद्धात पाकिस्तान पराभूत झाला असतांना त्याच्या पाठ्यपुस्तकात त्याने विजय मिळवल्याचे शिकवले जाते, अशा पाकवर कोण विश्वास ठेवणार ?