अभिनेते राहुल सोलापूरकर यांची वदंती
मुंबई – ‘पेटारे-बिटारे काहीच नव्हते, छत्रपती शिवराय औरंगजेबाच्या सरदारांना लाच देऊन आगर्याहून सुटून महाराष्ट्रात परतले. त्यांनी किती हुंडा वटवला, याचे पुरावे आहेत. औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोलाही लाच दिली, मोईन खान सरदाराकडून स्वाक्षरी-शिक्क्याचे अधिकृत पत्र घेतले. तो परवाना दाखवून शिवाजी महाराज आगर्यातून बाहेर पडले. स्वामी परमानंद ५ हत्ती घेऊन बाहेर पडले. हा इतिहास गोष्ट रूपात सांगायचा की, रंग भरून सांगावे लागते; रंजकता आली की, इतिहासाला छेद जातो’, असे शिवद्रोही आणि इतिहासविरोधी विधान अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले आहे. ‘मुक्काम पोस्ट मनोरंजन’ या यू ट्यूब वाहिनीवरील मुलाखतीत ते बोलत होते. इतिहास तज्ञांनी सांगितल्यानुसार औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना नजरकैदेत ठेवले. त्यांनी डावपेच आखून मिठाईच्या पेटार्यांमधून सुटका करून घेतली आणि औरंगजेबाच्या हातावर तुरी दिली. साधू-संत, मौलवींना फळे, मिठाई वाटणे, सरदारांना इनाम देणे हा इतिहास सर्वांना ज्ञात आहे.
संपादकीय भूमिका
|