|

कोल्हापूर – संभाजीनगरमधील सिल्लोडमध्ये एक लाखांहून अधिक बांगलादेशी घुसखोरांना बोगस प्रमाणपत्र वाटण्यात आल्याचा अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अभिनेता सैफ अली खान यांच्या निवासस्थानी घुसून आक्रमण करणार्या महंमद शरीफुल इस्लाम शहजाद या बांगलादेशी घुसखोराला अटक करण्यात आली. तो बनावट नावाने मुंबईत वास्तव्य करत होता. केवळ मुंबईच नव्हे, तर नवी मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सोलापूर यांसह राज्यभरात बांगलादेशी घुसखोरांचा अक्षरश: सुळसुळाट झाला आहे. तरी ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवा; घुसखोरांना साहाय्य करणार्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करा, अशी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनाद्वारे करण्यात आली. २७ जानेवारीला शिवाजी महाराज चौक येथे झालेल्या या आंदोलनात प्रशासनास जाग येण्यासाठी घंटानाद करण्यात आला. या प्रसंगी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
रत्नागिरीतील चिपळूण १३ बांगलादेशी नागरिकांपैकी ३ जणांनाच अटक करण्यात आली; त्यातही पोलिसांनी हे प्रकरण नीट न हाताळल्यामुळे बांगलादेशी घुसखोरांना जामीन मिळाला, ही अतिशय गंभीर गोष्ट आहे. देशाची न्यायव्यवस्था बांगलादेशी घुसखोरांना जामीन देते, ही न्यायदेवतेची थट्टा आहे. नवी मुंबई, ठाणे, सोलापूर, पिंपरी-चिंचवड आदी शहरी भागांमध्येही शेकडो बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना अटक झाली. ठाणे आणि पालघर जिल्ह्यांत १८ सहस्रांहून अधिक बेकायदेशीर घुसखोर रहात असल्याचा अंदाज आहे. अशीच स्थिती राज्यभरात आहे. खरेतर ही आकडेवारी म्हणजे हिमनगाचे टोक आहे. बांगलादेशी घुसखोर ही समस्या देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गंभीर असून याची पाळेमुळे खणून काढणे अत्यावश्यक आहे, असे या वेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
या वेळी करण्यात आलेल्या मागण्या
१. राज्यात ‘बांगलादेशी घुसखोर शोध मोहीम’ राबवावी; या अंतर्गत राज्यातील सर्वच जिल्हे, शहरे, तालुके येथील संशयित ठिकाणी ‘सर्च ऑपरेशन’ / ‘कोंम्बिंग ऑपरेशन’ राबवून बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढावे; बनावट ओळखपत्रे सिद्ध करणार्या टोळीची पाळेमुळे उखडून त्यावर कठोर कारवाई करावी.
२. भाड्याने खोली देण्याआधी घरमालकाने भाडेकरूंची, तसेच कामावर ठेवतांना कामगारांची योग्य ती चौकशी करावी, संशयास्पद आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे; घुसखोरांना आश्रय देणारे, जामीन देणारे किंवा कोणत्याही प्रकारचे साहाय्य करणारे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा नोंद करावा.
या आंदोलनात हिंदु एकता आंदोलनाचे शहराध्यक्षश्री. गजानन तोडकर, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख श्री. संभाजीराव भोकरे आणि करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे श्री. आनंदराव पवळ आणि श्री. किरण कुलकर्णी, राष्ट्रहित प्रतिष्ठानचे श्री. शरद माळी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी अन् सौ. राजश्री तिवारी, शिवशाही फाऊंडेशनचे संस्थापक श्री. सुनील सामंत, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, मंदिर महासंघाचे कोल्हापूर जिल्हा सहसमन्वयक श्री. अभिजित पाटील यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.
उपस्थित मान्यवर
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. विकास जाधव, विश्व हिंदु परिषदेचे श्री. अनिल दिंडे, श्री. अशोक गुरव, हिंदु महासभेच्या महिला आघाडीप्रमुख सौ. शिलाताई माने, हिंदु महासभेचे श्री. राजू तोरस्कर, ‘श्री‘ संप्रदायाचे जिल्हाध्यक्ष श्री. कृष्णात माळी, सनातन संस्थेचे त्वचारोगतज्ञ डॉ. मानसिंग शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे श्री. सुशील भांदिगरे
विशेष
१. या आंदोलनासाठी शिरोली, नागाव, गिरगाव, केर्ले येथून धर्मप्रेमी उपस्थित होते.
२. देशव्यापी होत असलेल्या या मोहिमेचा कोल्हापूर येथून प्रारंभ करण्यात आला.