
मुंबई – येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपति मंदिरात दर्शनासाठी येणार्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेतल्यानंतर श्री गणेशाचा आशीर्वाद म्हणून टिळा लावण्याचा स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने अभिनंदन ! अशाच प्रकारे राज्यातील अन्य मंदिरांमध्येही कपाळावर टिळा लावण्याचा निर्णय संबंधित मंदिर विश्वस्त तथा मंदिर प्रशासन यांनी घ्यावा, असे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने केले आहे.
हिंदु धर्मात कपाळी टिळा लावण्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. कपाळावर टिळा लावण्याने भक्ताला त्या देवतेची शक्ति आणि चैतन्य यांचा लाभ होतो, तसेच त्या त्या देवाप्रती भक्तीभाव वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे श्री सिद्धिविनायक मंदिराच्या कृतीचे अन्य सर्व मंदिरे अनुकरण करतील, अशी आशा आहे, असे मंदिर महासंघाने म्हटले आहे.
देवस्थान भूमीसंदर्भात शासकीय देवस्थान समितीची पहिली बैठक पार पडली !
अधिवेशनकाळात विधानभवनातील वाहनतळ व्यवस्था कामचलाऊ !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या रथास चांदी लावण्याच्या कामास प्रारंभ !
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
पुणे येथे पिण्याच्या पाण्याचा गैरवापर करणार्यास १० सहस्र रुपये दंड !