
मुंबई – येथील प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक गणपति मंदिरात दर्शनासाठी येणार्या प्रत्येक भाविकाला दर्शन घेतल्यानंतर श्री गणेशाचा आशीर्वाद म्हणून टिळा लावण्याचा स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने नुकताच घेतला आहे. या निर्णयाचे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने अभिनंदन ! अशाच प्रकारे राज्यातील अन्य मंदिरांमध्येही कपाळावर टिळा लावण्याचा निर्णय संबंधित मंदिर विश्वस्त तथा मंदिर प्रशासन यांनी घ्यावा, असे आवाहन ‘महाराष्ट्र मंदिर महासंघा’ने केले आहे.
हिंदु धर्मात कपाळी टिळा लावण्याला विशेष आध्यात्मिक महत्त्व आहे. कपाळावर टिळा लावण्याने भक्ताला त्या देवतेची शक्ति आणि चैतन्य यांचा लाभ होतो, तसेच त्या त्या देवाप्रती भक्तीभाव वाढण्यास साहाय्य होते. त्यामुळे श्री सिद्धिविनायक मंदिराच्या कृतीचे अन्य सर्व मंदिरे अनुकरण करतील, अशी आशा आहे, असे मंदिर महासंघाने म्हटले आहे.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !