
नवी देहली – भारतीय नागरिकत्व सोडून विदेशात जाणार्या भारतियांच्या संख्येने वाढ होत आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने राज्यसेभेत आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांच्या प्रश्नावरील उत्तरात दिली. या सर्वांनी वैयक्तिक कारणाने नागरिकत्व सोडल्याचे सांगितले जात आहे.
वर्ष २०१९ मध्ये १ लाख ४४ सहस्र १७ भारतियांनी नागरिकत्व सोडले, तर वर्ष २०२० मध्ये ८५ सहस्र २५६ लोकांनी, वर्ष २०२१ मध्ये १ लाख ६३ सहस्र ३७०, वर्ष २०२२ मध्ये २ लाख २५ सहस्र ६२० आणि वर्ष २०२३ मध्ये २ लाख १६ सहस्र लोकांनी नागरिकत्व सोडण्याचा निर्णय घेतला.
भारतियांचे अमेरिकेला प्राधान्य
वर्ष २०१८ ते २०२३ च्या मध्यापर्यंत भारतातून ३ लाख २८ सहस्र ६१९ भारतियांनी अमेरिकेचे नागरिकत्व घेतले. तसेच १ लाख ६१ सहस्र ९१७ जणांनी कॅनडा आणि १ लाख ३१ सहस्र ८८३ जणांनी ऑस्ट्रेलिया देशांचे नागरिकत्व घेतले आहे.
देहली येथे अराजक माजवण्याचा झुरळांचा (कॉकरोच जनता पार्टीचा) डाव फसला !
‘शौर्य प्रशिक्षण शिबिरा’त ३२५ हून अधिक तरुण-तरुणींनी घेतला सहभाग !
माहिती अधिकार कायद्यातील पालटांच्या विरोधात अण्णा हजारे आक्रमक
Love Jihad In India : भारतात गेल्या २४ घंट्यांत लव्ह जिहादच्या ३ घटना उघड
पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीच्या रासायनिक लेपनास न्यायालयाची स्थगिती !
श्री चांगदेव महाराजांच्या मंदिरात धर्मांधांकडून अतिक्रमण !