‘जीवित रहाणे किंवा साधना करणे यांसाठी मनुष्याला प्राणवायू, सूर्यप्रकाश, आहार आदी विविध घटकांची आवश्यकता भासते. ‘आहार’ या एकाच घटकाचा जरी विचार केला, तरी त्यासंदर्भात किती व्यापक स्तरावर कृतज्ञताभाव ठेवता येतो, हे पुढे दिले आहे. आहाराप्रमाणेच जीवनातील प्रत्येक घटकाविषयी व्यापक स्तरावर कृतज्ञताभाव ठेवायचा प्रयत्न केला, तर अध्यात्मात लवकर प्रगती होते. याचे कारण म्हणजे, कृतज्ञताभावामुळे शरणागती लवकर निर्माण होते आणि गुरु किंवा देव परम दयाळू असल्याने तो शरणागतांवर लवकर कृपा करतो.

१. पंचमहाभूतांप्रती (पंचतत्त्वांप्रती) कृतज्ञता
पृथ्वी / माती (पृथ्वीतत्त्व), जल (आपतत्त्व), सूर्य (तेजतत्त्व), वायू (वायुतत्त्व) आणि आकाश (आकाशतत्त्व) यांमुळे अन्न निर्माण होते.
२. गुरु किंवा ईश्वर यांच्याप्रती कृतज्ञता
गुरु किंवा ईश्वर यांच्या कृपेमुळेच आपल्या भाग्यात अन्नग्रहण करणे शक्य होते; अन्यथा पृथ्वीतलावरील कित्येक जीव अन्न-पाणी न मिळाल्याने मृत्यूमुखी पडत असतात.
३. वनस्पती किंवा प्राणी यांच्याप्रती कृतज्ञता
वनस्पतींमुळे धान्य, भाज्या, फळे आदी, तर गाय-म्हैस यांच्यामुळे दूध, तूप आदी अन्न मिळते.
४. समाजाप्रती कृतज्ञता
शेतकरी, व्यापारी आणि भाजीवाले आपल्याला आहारासाठी लागणारे अन्नधान्य उपलब्ध करून देतात.
५. कुटुंबीय किंवा साधक यांच्याप्रती कृतज्ञता
घरी कुटुंबीय आणि आश्रमात साधक आपल्यासाठी भोजन सिद्ध करतात.
६. स्वतःच्या शरिराप्रती कृतज्ञता
आपले शरीर आहार ग्रहण करून कार्यक्षम रहाते; म्हणून आपण साधना करू शकतो.’
– (पू.) श्री. संदीप आळशी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
श्री जगन्नाथदेवाची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
साधकांनो, स्वतःमधील स्वभावदोषांमुळे खचून न जाता सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सांगितलेल्या साधनेवर अढळ श्रद्धा ठेवून प्रयत्नरत रहा !
कलेच्या माध्यमातून समाजापर्यंत साधना पोचवण्यासाठी करायच्या समष्टी सत्सेवेची माध्यमे !
श्रीराममंदिराला सरकारनियुक्त अधिकार्याची नाही, रामभक्ताची आवश्यकता !