
पंढरपूर – श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील गोल रिंगण बाजीराव विहीर (तालुका पंढरपूर) येथे लाखो भाविकांच्या उपस्थितीत १५ जुलै या दिवशी मोठ्या उत्साहात पार पडले. हे रिंगण पहाण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. या वेळी प्रशासनाकडूनही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच आरोग्य विभागाच्या वतीनेही भाविकांसाठी विविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. बाजीराव विहीर येथे पार पडलेल्या या रिंगण सोहळ्यामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या अश्वाने २ फेर्या मारल्यानंतर माऊलींच्या अश्वाच्या खुराने उधळलेली माती स्वत:च्या कपाळी लावण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. सर्व दिंड्या माऊलींच्या पालखीच्या पुढे भजन करत निघाल्या होत्या. फुगडी खेळत, मनोरे करून पखवाज वाजवत असे विविध खेळ खेळत वारकर्यांनी या रिंगण सोहळ्याचा आनंद घेतला. १६ जुलैच्या रात्री सर्व दिंड्या पंढरपूर येथे आल्या आहेत. १७ जुलैच्या पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शासकीय महापूजा करतील.
थोडक्यात महत्त्वाचे : ०८.०६.२०२६
पुणे येथे हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे धर्मांतर करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक छळ !
तीर्थक्षेत्र पैठण येथे ८ नाल्यांचे दुर्गंधीयुक्त आणि रसायनमिश्रित पाणी गोदावरी नदीपात्रात !
भिगवण (पुणे) येथे अल्पवयीन मुलीला धमक्या देत विनयभंग !
तुळापूर (आळंदी) येथील ‘विश्वसंस्कृती’ इमारतीतील अनधिकृत ‘प्रोजेक्ट एक्स’ मेजवानीवर पोलिसांची धाड !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !