वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातील काही क्षणमोती !

हिंदु राष्ट्राचा सामूहिक उद्घोष

डावीकडून घाना येथील इस्कॉनचे श्रीवास दास वनचारी, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, नेपाळ येथील शंकर खराल, बंगाल येथील निर्गुणानंद पुरी, मध्यप्रदेशमधील इंदूर येथील स्वामी प्रणवानंद सरस्वती आणि इंडोनेशिया येथील रस आचार्य डॉ. धर्मयश

एकत्र जमल्यावर एका क्षणी आनंद व्यक्त करतांना जवळिकीचे आणि आपुलकीचे दर्शन घडवणारे महोत्सवातील मान्यवर ! 

डावीकडून अमेरिकेतील डॉ. नीलेश ओक, राष्ट्रीय कीर्तनकार पू. प्रा. सु.ग. शेवडे आणि हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे
डावीकडून छत्तीसगड येथील श्री. विष्णु पटेल आणि श्री. सुरेंद्र बहादुर सिंह यांचा परिचय आणि संपर्क क्रमांक घेतांना कर्नाटक येथील श्री. गिरीश पाटील (उजवीकडे)
महोत्सवातील २ सत्रांच्या मधल्या वेळेत संघटनेच्या कार्यकर्त्यांसमवेत अनौपचारिक चर्चा करतांना हिंदु इळैंगर येळूच्ची पेरवई (हिंदु युवा जागरूकता महासंघ) या संघटनेचे अध्यक्ष श्री. पाला संतोष

जरी आमुची मते वेगळी, असे आमुची कृती आगळी । ध्येय आमचे परी हिंदु राष्ट्राचे, कार्य हे धर्मसंस्थापनेचे ।।

मंदिरात जातांना ‘साक्षात् भगवंताला भेटण्यासाठी जात आहे’, असा श्रद्धावान हिंदूंचा भाव असतो. या श्रद्धेने आणि भावाने जेव्हा हिंदू मंदिरात जातात, तेव्हा त्यांना भगवंताची, तसेच आनंदाची अनुभूती येते. अशा मंदिरात नास्तिक आणि जिहादी प्रवेश करत असून त्यांना रोखण्याची आवश्यकता नाही का ? सर्व मंदिरांचा कारभार हिंदूंच्या दानावर चालतो. धर्मांतरित हिंदू जर मंदिरात येऊ इच्छित असतील, तर त्यांचे अवश्य स्वागत केले जाईल; परंतु जे श्रद्धाहीन आहेत, त्यांना मंदिरात प्रवेश कदापि मिळू नये. भारतभरातील मंदिरांत हा प्रवेश निषिद्ध असावा.

– कु. कृतिका खत्री, सनातन संस्था