Air India Flight Delay : ८ घंटे उड्डाणाला विलंब झाल्याने एअर इंडियाच्या विमानात अनेक प्रवासी बेशुद्ध

विमानातील वातानुकूलित यंत्रणा होती बंद

नवी देहली – देहलीतून अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथे जाणार्‍या एअर इंडियाच्या विमानाला ८ घंटे विलंब झाल्याने विमानात बसलेले प्रवासी उष्णतेमुळे बेशुद्ध पडले. विमानातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याने ही घटना घडली.  विमानाला विलंब होत असूनही प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यात आले नाही. त्यामुळेच ही घटना घडली. याविषयी प्रवाशांनी सामाजिक माध्यमांतून अप्रसन्नता व्यक्त केली. ८ घंट्यानंतर या प्रवाशांना हॉटेलमध्ये नेण्यात आले. या प्रकरणी एअर इंडियाने ‘एक्स’वर उत्तर देतांना प्रवाशांना झालेल्या गैरसोयीविषयी खंत व्यक्त केली आहे.

संपादकीय भूमिका

अशा प्रकारचा निष्काळजीपणा करणार्‍या असंवेदनशील आस्थापनाकडून हानीभरपाई वसूल केली पाहिजे !