मुंबई – हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवस राज्यात उष्णतेची लाट कायम रहाण्याची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील तुरळक भागांमध्ये पाऊस किंवा विजांच्या गडगडाटासह पाऊस बरसू शकतो. पुणे, जळगाव, धुळे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, जालना या १० जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह वादळी वारे वाहू शकतात. उत्तर महाराष्ट्रात नाशिक आणि अहमदनगरमध्ये तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. मुंबईत उष्ण आणि दमट हवामान कायम रहाणार आहे. मान्सून १९ मेपर्यंत अंदमानात आल्यास ३१ मेच्या आसपास नैऋत्य मोसमी वारे केरळमध्ये वहातील. त्यामुळे ७ ते १० जूनच्या आसपास महाराष्ट्रात पाऊस पडू शकतो.
आणखी २ दिवस राज्यात उष्णतेची लाट !
नूतन लेख
- महालक्ष्मी स्थानक आणि परिसर यांचा पुनर्विकास होणार !
- भारताकडून नामांकनासाठी पाठवलेल्या १२ गड-दुर्गांविषयी ‘युनेस्को’चा अहवाल जुलैपर्यंत मिळणार !
- अक्षय शिंदे याच्या अंत्यविधीसाठी जागा देण्याची सरकारची न्यायालयात ग्वाही !
- महायुतीत माझ्यासाठी जागा नसल्यामुळे मी विधान परिषदेवर ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, आमदार
- प्रतिदिन राज्यभरातून येणार्या सहस्रो वारकर्यांची पंढरपूर येथे लूटमार !
- पश्चिम महाराष्ट्रात सर्व वर्गवारीतील वीज ग्राहकांकडे ४१६ कोटी रुपयांची वीजदेयकांची थकबाकी !