किरकोळ वादावरून मुसलमानांनी केली मुख्यमंत्री कार्यालयातील शिपायाची हत्या !

एकाला मारहाण !

मुंबई – मुलुंड (पश्‍चिम) येथे पैशांवरून झालेल्या किरकोळ वादावरून मुसलमानांनी मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालयातील शिपायाची तीक्ष्ण हत्यार भोसकून हत्या केली. अक्षय नार्वेकर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी इम्रान मेहमूद खान, सलिम मेहमूद खान, फारूख बागवान, नौशाद बागवान आणि अब्दुल बागवान यांना अटक केली असून त्यांच्या विरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. स्थानिक न्यायालयाने या सर्व आरोपींना ८ मेपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अक्षय नार्वेकर यांच्यासमवेत असलेले आकाश साबळे यांनाही मुसलमानांनी मारहाण केली आहे. साबळे यांचीही प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर शीव येथील रुग्णालयात उपचार चालू आहेत.

१.  २८ एप्रिल या दिवशी अक्षय नार्वेकर यांनी ठाणे येथील किसननगर येथे इम्रान याच्या चिकन सेंटरमधून चिकन तंदूरी घेतली होती. या वेळी रोख पैसे नसल्याने इम्रान आणि अक्षय यांच्यामध्ये वाद झाला. या वेळी अक्षय यांनी ‘गुगल पे’द्वारे पैसे दिले.

२. त्याच सायंकाळी अक्षय नार्वेकर आणि आकाश साबळे मुलुंड (पश्‍चिम) येथील इम्रान याचा मित्र सलीम याच्या चिकन सेंटरच्या येथे गेले होते. तेथे इम्रान होता. या वेळी त्यांच्या वाद होऊन हाणामारी झाली. या वादानंतर अक्षय नार्वेकर आणि आकाश साबळे ठाणे येथे निघून गेले.

३. त्यानंतर सलीम आणि इम्रान यांनी दोघांचा पाठलाग केला. अक्षय नार्वेकर आणि आकाश साबळे ठाणे येथील वैशालीनगर बसस्थानकाच्या येथे उभे असतांना मटण कापण्याचा सुरा आणि लोखंडी रॉड यांनी सलीम अन् इम्रान यांनी त्यांच्यावर आक्रमण केले.

४. यामध्ये अक्षय नार्वेकर याचा जागीच मृत्यू झाला, तर आकाश तेथे बेशुद्ध पडला.

संपादकीय भूमिका 

किरकोळ वादावरून थेट हिंदूंची हत्या करण्याइतपत उद्याम झालेले मुसलमान ! अशांवर वचक बसवण्यासाठी सरकार काय पावले उचलणार ?