देशविरोधी औवेसींच्या ‘ए.एम्.आय.एम्.’सारख्या पक्षाचा पाठिंबा छत्रपती शाहू महाराज यांची स्वीकारणे हा काळा दिवस ! – सकल हिंदू समाज

पत्रकार परिषदेत उपस्थित मान्यवर

कोल्हापूर – देशविरोधी औवेसींच्या ‘ए.एम्.आय.एम्.’सारख्या पक्षाचा पाठिंबा काँग्रेसचे उमेदवार छत्रपती शाहू महाराज यांनी स्वीकारणे, हा कोल्हापूर जिल्ह्यातील काळा दिवस आहे, असे आम्ही मानतो. ‘ए.एम्.आय.एम्.’चा पाठिंबा स्वीकारून महाराज जिल्ह्यात जिहादी हिरव्या सापांना राजाश्रय का देत आहेत का ? उद्या जर कोल्हापूर येथे धर्मांध जिहादी सिद्ध झाले, तर याचे सर्वस्वी दायित्व हे महाराजांचे असेल. तरी निवडणुकीसाठी कोल्हापूरकरांचे भविष्य अंधारात लोटू नका, असे आवाहन सकल हिंदू समाजाच्या वतीने २४ एप्रिलला घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, हिंदू एकता आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक देसाई, शहराध्यक्ष श्री. गजानन तोडकर, ‘शिवशाही फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोल्हापूर शहर कार्यवाह श्री. आशिष लोखंडे, अखिल भारत हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप सासणे, महाराज प्रतिष्ठानचे श्री. निरंजन शिंदे, श्री. अर्जुन आंबी, श्री. योगेश केरकर उपस्थित होते. सकल हिंदू समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, औरंगाबादच्या नामांतरास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली अन् त्याचे संभाजीनगर असे नामांतर करण्यात आले. या निर्णयास ‘ए.एम्.आय.एम्.’ने विरोध दर्शवला. संभाजीनगर येथे जातीय दंगली घडवून आणल्या. छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या नावाला विरोध करणार्‍या लोकांना देशविरोधी म्हटले पाहिजे. त्यामुळे शाहू छत्रपती ‘ए.एम्.आय.एम्.’चा पाठिंबा स्वीकारतात, ही गोष्ट कोणत्याही शिवभक्ताला पटणारी नाही. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ संघटना हा डाव मोडून काढतील आणि काँग्रेसच्या विरोधात प्रचार करतील, हे लक्षात घ्यावे. कोल्हापूर जिल्ह्यातील हिंदुत्वाची शक्ती जागृत होऊन काँग्रेसला जिल्ह्यातून हद्दपार करतील.

छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ‘ए.एम्.आय.एम्.’कडे पाठिंबा मागितलेला नाही, दिला तरी स्वीकारला नाही ! – महाविकास आघाडी

‘ए.एम्.आय.एम्.’सारख्या पक्षाकडे आम्ही पाठिंबा मागितलेला नाही. त्यामळे तो स्वीकारण्याचा प्रश्न येत नाही. या विषयाचे भांडवल करून समाजात गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होत आहे. छत्रपती शाहू छत्रपती यांचा विजय निश्चित असल्याने असे प्रकार विरोधात करत आहेत; मात्र अशा प्रचाराला सूज्ञ जनता फसणार नाही, असे पत्रक महाविकास आघाडीच्या कोल्हापूर जिल्ह्यातील घटक पक्षाच्या नेत्यांनी प्रसिद्धीस दिले आहे.