अरुणाचल प्रदेशातील गावांची नावे पालटल्याच्या घटनेवर परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर यांनी चीनला सुनावले !

सूरत (गुजरात) – आज मी एखाद्या घराचे नाव पालटले, तर ते माझे होईल का ? अरुणाचल प्रदेश भारताचे राज्य होते, आहे आणि राहील. नाव पालटल्याने काही फरक पडणार नाही, अशा शब्दांत भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी चीनला फटकारले. चीनने अरुणाचल प्रदेशातील ३० ठिकाणांची नावे पालटून तो स्वतःचा भाग असल्याचा दावा केला होता. यामध्ये ११ रहिवासी क्षेत्रे, १२ पर्वत, ४ नद्या, १ तलाव आणि डोंगरातून जाणारा १ मार्ग यांचा समावेश आहे. याविषयी सूरत शहरातील एका कार्यक्रमात डॉ. जयशंकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. गेल्या ७ वर्षात चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावे पालटण्याची ही चौथी वेळ आहे.
सौजन्य DNAIndiaNews
लडाखमध्ये अतिक्रमण केल्याच्या चीनच्या दाव्यावरही परराष्ट्रमंत्र्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. याला प्रत्युत्तर देतांना ते म्हणाले की, आपले सैन्य प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात आहे. त्यांना कधी काय करायचे ?, ते ठाऊक आहे.
संपादकीय भूमिकाचीनला शब्दांची भाषा समजत नसल्याने त्याला समजेल अशा भाषेतच आता उत्तर देण्याची आवश्यकता आहे ! |
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !